शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी  झालो परदेशी तुझविण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 10:08 IST

सत्संगातील वारी

 पांडुरंगाची केव्हा भेट होईल, याची तीव्र इच्छा बाळगून मार्गस्थ झालेले वारकरी भाविक वाखरीपर्यंत पोहोचलेले आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भाव आहे. मला माझा प्राणप्रिय विठोबाचे दर्शन केव्हा मिळेल? वाखरीमध्ये सर्व संतांच्या पालख्या मुक्कामाला येतात. आषाढ शुद्ध दशमीला विसाव्याजवळ सर्व पालख्यांचे उभे रिंगण केले जाते. प्रत्येक पालखीतील अश्व रिंगण पूर्ण करून पंढरपूरमध्ये प्रवेश करतो. विसाव्याजवळ पालखीतील पादुका गळ्यामध्ये घेतल्या जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील माऊलींच्या पादुका आरफळकर मालकांच्या घरामध्ये दिल्या जातात.

या सर्व संतांच्या पादुकांसहित वारकरी भाविक चंद्रभागेजवळ येऊन पादुकांना स्नान घातले जाते. आणि नंतर पंढरीमध्ये नामस्मरण करत आपल्या स्थानावर या पालख्या पोहोचतात. पालखी प्रस्थान करून मार्गक्रमण करणाºया वारकरी, भाविक मंडळींना आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहºयावरून ओसंडत असताना पाहावयास मिळते. आपण पंढरीच्या वारीचा जो नित्यनेम स्वीकारलेला आहे तो पूर्णत्वास जात असल्याचा आनंद त्यांना होतो. संतांच्या संगतीमध्ये आपणाला सेवा करता आल्याचे भाग्य वारीमध्ये लाभले. संतांच्या बरोबर मला वारी पूर्ण करता आली, हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असतो.

कारण संतांची संगती ही जीवनामध्ये खूपच दुर्लभ असून, देवकृपेशिवाय प्राप्त होत नाही. ‘बहू अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करून केली’ या संत वचनाप्रमाणे सत्संग हा खूपच कठीण असून, मनुष्य जीवनासाठी तो महत्त्वाचा आहे. अशी संगती वर्षातून एकदा वारीमध्ये आपणास मिळते व त्या संगतीमध्ये सेवा करता येते. सत्संगातील साधनेला व सेवेला खूपच महत्त्व आहे. ‘ते ज्ञान पै गा बरवे जरी मनी आनावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी’ ज्ञानप्राप्तीसाठी सेवा हे एकमेव माध्यम आहे. ती सेवा अठरा दिवस वारीमध्ये व्यवस्थितरीत्या करता येते. निष्काम सेवेचे संस्कार व्हावेत, यासाठीच वारीचा प्रघात पाहावयास मिळतो. असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण वारीमध्ये चालणाºया भाविकांना सत्संग देऊन सेवा प्राप्त करून देण्याची देवकृपा सहज मिळते. त्यामुळे वारी करणारा भाविक हा भाग्यवान ठरतो.

या भाविकाला ही साधनसामुग्री उपलब्ध करण्यासाठी स्वप्रयत्न करावा लागत नाही. या संगतीतील वारीचा, भजनाचा, सेवेचा आनंद उपभोगण्यासाठी नित्यनेमाने वारी करणारे भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले असतात. ‘चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवी वरा पाहू’ त्यामुळेच जन्माला आलेल्या सर्व जीवाला आवाहन केले जाते. जीवनामध्ये आपण पंढरीची वारी केली पाहिजे. ज्या भाविकांना वारीचे महत्त्व लक्षात आलेले आहे ते दरवर्षी निष्ठेने वारीमध्ये सहभागी होतात. देवाला ही प्रार्थना करतात, माझा हा नित्यनियम कधीही चुकू देऊ नको. ‘पंढरीची वारी चुको न दे हरी’- सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी