शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी  झालो परदेशी तुझविण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 10:08 IST

सत्संगातील वारी

 पांडुरंगाची केव्हा भेट होईल, याची तीव्र इच्छा बाळगून मार्गस्थ झालेले वारकरी भाविक वाखरीपर्यंत पोहोचलेले आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भाव आहे. मला माझा प्राणप्रिय विठोबाचे दर्शन केव्हा मिळेल? वाखरीमध्ये सर्व संतांच्या पालख्या मुक्कामाला येतात. आषाढ शुद्ध दशमीला विसाव्याजवळ सर्व पालख्यांचे उभे रिंगण केले जाते. प्रत्येक पालखीतील अश्व रिंगण पूर्ण करून पंढरपूरमध्ये प्रवेश करतो. विसाव्याजवळ पालखीतील पादुका गळ्यामध्ये घेतल्या जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील माऊलींच्या पादुका आरफळकर मालकांच्या घरामध्ये दिल्या जातात.

या सर्व संतांच्या पादुकांसहित वारकरी भाविक चंद्रभागेजवळ येऊन पादुकांना स्नान घातले जाते. आणि नंतर पंढरीमध्ये नामस्मरण करत आपल्या स्थानावर या पालख्या पोहोचतात. पालखी प्रस्थान करून मार्गक्रमण करणाºया वारकरी, भाविक मंडळींना आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहºयावरून ओसंडत असताना पाहावयास मिळते. आपण पंढरीच्या वारीचा जो नित्यनेम स्वीकारलेला आहे तो पूर्णत्वास जात असल्याचा आनंद त्यांना होतो. संतांच्या संगतीमध्ये आपणाला सेवा करता आल्याचे भाग्य वारीमध्ये लाभले. संतांच्या बरोबर मला वारी पूर्ण करता आली, हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असतो.

कारण संतांची संगती ही जीवनामध्ये खूपच दुर्लभ असून, देवकृपेशिवाय प्राप्त होत नाही. ‘बहू अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करून केली’ या संत वचनाप्रमाणे सत्संग हा खूपच कठीण असून, मनुष्य जीवनासाठी तो महत्त्वाचा आहे. अशी संगती वर्षातून एकदा वारीमध्ये आपणास मिळते व त्या संगतीमध्ये सेवा करता येते. सत्संगातील साधनेला व सेवेला खूपच महत्त्व आहे. ‘ते ज्ञान पै गा बरवे जरी मनी आनावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी’ ज्ञानप्राप्तीसाठी सेवा हे एकमेव माध्यम आहे. ती सेवा अठरा दिवस वारीमध्ये व्यवस्थितरीत्या करता येते. निष्काम सेवेचे संस्कार व्हावेत, यासाठीच वारीचा प्रघात पाहावयास मिळतो. असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण वारीमध्ये चालणाºया भाविकांना सत्संग देऊन सेवा प्राप्त करून देण्याची देवकृपा सहज मिळते. त्यामुळे वारी करणारा भाविक हा भाग्यवान ठरतो.

या भाविकाला ही साधनसामुग्री उपलब्ध करण्यासाठी स्वप्रयत्न करावा लागत नाही. या संगतीतील वारीचा, भजनाचा, सेवेचा आनंद उपभोगण्यासाठी नित्यनेमाने वारी करणारे भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले असतात. ‘चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवी वरा पाहू’ त्यामुळेच जन्माला आलेल्या सर्व जीवाला आवाहन केले जाते. जीवनामध्ये आपण पंढरीची वारी केली पाहिजे. ज्या भाविकांना वारीचे महत्त्व लक्षात आलेले आहे ते दरवर्षी निष्ठेने वारीमध्ये सहभागी होतात. देवाला ही प्रार्थना करतात, माझा हा नित्यनियम कधीही चुकू देऊ नको. ‘पंढरीची वारी चुको न दे हरी’- सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी