शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

‘बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी  झालो परदेशी तुझविण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 10:08 IST

सत्संगातील वारी

 पांडुरंगाची केव्हा भेट होईल, याची तीव्र इच्छा बाळगून मार्गस्थ झालेले वारकरी भाविक वाखरीपर्यंत पोहोचलेले आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भाव आहे. मला माझा प्राणप्रिय विठोबाचे दर्शन केव्हा मिळेल? वाखरीमध्ये सर्व संतांच्या पालख्या मुक्कामाला येतात. आषाढ शुद्ध दशमीला विसाव्याजवळ सर्व पालख्यांचे उभे रिंगण केले जाते. प्रत्येक पालखीतील अश्व रिंगण पूर्ण करून पंढरपूरमध्ये प्रवेश करतो. विसाव्याजवळ पालखीतील पादुका गळ्यामध्ये घेतल्या जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील माऊलींच्या पादुका आरफळकर मालकांच्या घरामध्ये दिल्या जातात.

या सर्व संतांच्या पादुकांसहित वारकरी भाविक चंद्रभागेजवळ येऊन पादुकांना स्नान घातले जाते. आणि नंतर पंढरीमध्ये नामस्मरण करत आपल्या स्थानावर या पालख्या पोहोचतात. पालखी प्रस्थान करून मार्गक्रमण करणाºया वारकरी, भाविक मंडळींना आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहºयावरून ओसंडत असताना पाहावयास मिळते. आपण पंढरीच्या वारीचा जो नित्यनेम स्वीकारलेला आहे तो पूर्णत्वास जात असल्याचा आनंद त्यांना होतो. संतांच्या संगतीमध्ये आपणाला सेवा करता आल्याचे भाग्य वारीमध्ये लाभले. संतांच्या बरोबर मला वारी पूर्ण करता आली, हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असतो.

कारण संतांची संगती ही जीवनामध्ये खूपच दुर्लभ असून, देवकृपेशिवाय प्राप्त होत नाही. ‘बहू अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करून केली’ या संत वचनाप्रमाणे सत्संग हा खूपच कठीण असून, मनुष्य जीवनासाठी तो महत्त्वाचा आहे. अशी संगती वर्षातून एकदा वारीमध्ये आपणास मिळते व त्या संगतीमध्ये सेवा करता येते. सत्संगातील साधनेला व सेवेला खूपच महत्त्व आहे. ‘ते ज्ञान पै गा बरवे जरी मनी आनावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी’ ज्ञानप्राप्तीसाठी सेवा हे एकमेव माध्यम आहे. ती सेवा अठरा दिवस वारीमध्ये व्यवस्थितरीत्या करता येते. निष्काम सेवेचे संस्कार व्हावेत, यासाठीच वारीचा प्रघात पाहावयास मिळतो. असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण वारीमध्ये चालणाºया भाविकांना सत्संग देऊन सेवा प्राप्त करून देण्याची देवकृपा सहज मिळते. त्यामुळे वारी करणारा भाविक हा भाग्यवान ठरतो.

या भाविकाला ही साधनसामुग्री उपलब्ध करण्यासाठी स्वप्रयत्न करावा लागत नाही. या संगतीतील वारीचा, भजनाचा, सेवेचा आनंद उपभोगण्यासाठी नित्यनेमाने वारी करणारे भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले असतात. ‘चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवी वरा पाहू’ त्यामुळेच जन्माला आलेल्या सर्व जीवाला आवाहन केले जाते. जीवनामध्ये आपण पंढरीची वारी केली पाहिजे. ज्या भाविकांना वारीचे महत्त्व लक्षात आलेले आहे ते दरवर्षी निष्ठेने वारीमध्ये सहभागी होतात. देवाला ही प्रार्थना करतात, माझा हा नित्यनियम कधीही चुकू देऊ नको. ‘पंढरीची वारी चुको न दे हरी’- सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी