शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

मानवतेच्या शिकवणीचा ध्यास घेतला पाहिजे. तीच खरी शिकवण ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:48 IST

जवळ-जवळ सर्व माणसे कोणत्या तरी पूर्वग्रही गटाचे सदस्यत्व पत्करून आयुष्य जगतात. त्या वेगवेगळ्या गटांच्या मूळ सिद्धांतात विलक्षण फरक आढळतो.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

मानवतेशी एकनिष्ठ राहण्याची संस्कृती प्रबळ झाली पाहिजे. मानवाने धर्मा-धर्मामधील तेढ कमी केला पाहिजे. बालकामध्ये किंवा शालेय जीवनात याची जाणीव करून दिली जावी. मानवतेचे मार्गदर्शन करणारे शिक्षण मिळावे. एकमेकांच्या संस्कृतीबद्दल जिज्ञासा ठेवल्यास मानवजात एकतेच्या शिखराकडे वाटचाल करेल. तेव्हा जो प्रमुख देव म्हणजे परमात्मा त्याचे स्पष्ट रूप लक्षात येईल. साध्याभोळ्या लोकांच्या मनातला भेदभाव निटावा. विज्ञानाच्या वेगवेगळ्या मर्यादित क्षेत्रांमध्ये बेजबाबदार मानवाने विनाकारण खटपट करू नये. त्याचे फळ एका भयंकर आत्मघातकी शक्तीच्या रूपाने प्रकट होते. त्या समस्या आपल्याला भेडसावत असतात.

जवळ-जवळ सर्व माणसे कोणत्या तरी पूर्वग्रही गटाचे सदस्यत्व पत्करून आयुष्य जगतात. त्या वेगवेगळ्या गटांच्या मूळ सिद्धांतात विलक्षण फरक आढळतो. आपसांतल्या भांडणात बुद्धी-शक्ती आणि इतर साधनसामग्री व्यर्थ घालवल्यामुळे आम्ही सर्व आता समस्याग्रस्त आहोत. प्रत्येक गटाचे पुढारी- स्वत:ला विद्वान समजतात. विद्वान संत, शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनी लिहून ठेवलेल्या सर्व चेतवण्यांकडे मात्र ते दुर्लक्ष करतात. आजही असे दिसून येते की सामान्य माणसाच्या आकलनशक्तीत असे दिसून येते की, सामान्य माणसाच्या आकलनशक्तीत वाढ झाली असली तरी, ती एवढी नाही की आधुनिक म्हणवून घेणाऱ्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांप्रमाणे विचार करतील. मानवाला महानतेची शिकवण देणे महत्त्वाचे आहे. पूर्वकालीन संतांना मानवतेच्या महानतेचे गणित सामान्य जनतेच्या मनात ढळकपणे मांडता आले. पण कमकुवत आकलनशक्तीच्या बांधवास समजून घेण्याची वृत्ती असली, सांभाळून घेण्याची समज असली, तर बुद्धिप्रामाण्यवादी परंपरा आणि आधुनिक विज्ञाननिष्ठ विचार यांचा योग नक्कीच घडवून आणेल. आजच्या या भीषण जागतिक समस्येने मनुष्यजातीला ग्रासले आहे. मानवाने निर्माण केलेल्या संहारक शक्ती विनाशकारी ठरू शकतात. आपल्या मनात अज्ञानाचा शत्रू दडलेला आहे. तो आळसरूपी अजगरच मनाभोवती वेटाळे घालून बसला आहे. ते घालवण्यासाठी एक आध्यात्मिक शक्तीचे तेज मनात नवचैतन्य निर्माण करते. त्या चैतन्यांनीच सर्व भेदभाव मिटतील. तेच चैतन्य जीवनातील अनंत अडचणी सोडवण्यास मदत करेल. त्या चैतन्य शक्तीचे तेज साक्षात विश्ववृत्तीचे अनंत दृश्य दाखवते. ते दृश्य दिसण्यासाठी नव्या उत्साहाने मानवतेच्या शिकवणीचा ध्यास घेतला पाहिजे. तीच खरी शिकवण ठरेल. ती शक्ती आध्यात्मिकतेत आहे.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक