शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेच्या शिकवणीचा ध्यास घेतला पाहिजे. तीच खरी शिकवण ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:48 IST

जवळ-जवळ सर्व माणसे कोणत्या तरी पूर्वग्रही गटाचे सदस्यत्व पत्करून आयुष्य जगतात. त्या वेगवेगळ्या गटांच्या मूळ सिद्धांतात विलक्षण फरक आढळतो.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

मानवतेशी एकनिष्ठ राहण्याची संस्कृती प्रबळ झाली पाहिजे. मानवाने धर्मा-धर्मामधील तेढ कमी केला पाहिजे. बालकामध्ये किंवा शालेय जीवनात याची जाणीव करून दिली जावी. मानवतेचे मार्गदर्शन करणारे शिक्षण मिळावे. एकमेकांच्या संस्कृतीबद्दल जिज्ञासा ठेवल्यास मानवजात एकतेच्या शिखराकडे वाटचाल करेल. तेव्हा जो प्रमुख देव म्हणजे परमात्मा त्याचे स्पष्ट रूप लक्षात येईल. साध्याभोळ्या लोकांच्या मनातला भेदभाव निटावा. विज्ञानाच्या वेगवेगळ्या मर्यादित क्षेत्रांमध्ये बेजबाबदार मानवाने विनाकारण खटपट करू नये. त्याचे फळ एका भयंकर आत्मघातकी शक्तीच्या रूपाने प्रकट होते. त्या समस्या आपल्याला भेडसावत असतात.

जवळ-जवळ सर्व माणसे कोणत्या तरी पूर्वग्रही गटाचे सदस्यत्व पत्करून आयुष्य जगतात. त्या वेगवेगळ्या गटांच्या मूळ सिद्धांतात विलक्षण फरक आढळतो. आपसांतल्या भांडणात बुद्धी-शक्ती आणि इतर साधनसामग्री व्यर्थ घालवल्यामुळे आम्ही सर्व आता समस्याग्रस्त आहोत. प्रत्येक गटाचे पुढारी- स्वत:ला विद्वान समजतात. विद्वान संत, शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनी लिहून ठेवलेल्या सर्व चेतवण्यांकडे मात्र ते दुर्लक्ष करतात. आजही असे दिसून येते की सामान्य माणसाच्या आकलनशक्तीत असे दिसून येते की, सामान्य माणसाच्या आकलनशक्तीत वाढ झाली असली तरी, ती एवढी नाही की आधुनिक म्हणवून घेणाऱ्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांप्रमाणे विचार करतील. मानवाला महानतेची शिकवण देणे महत्त्वाचे आहे. पूर्वकालीन संतांना मानवतेच्या महानतेचे गणित सामान्य जनतेच्या मनात ढळकपणे मांडता आले. पण कमकुवत आकलनशक्तीच्या बांधवास समजून घेण्याची वृत्ती असली, सांभाळून घेण्याची समज असली, तर बुद्धिप्रामाण्यवादी परंपरा आणि आधुनिक विज्ञाननिष्ठ विचार यांचा योग नक्कीच घडवून आणेल. आजच्या या भीषण जागतिक समस्येने मनुष्यजातीला ग्रासले आहे. मानवाने निर्माण केलेल्या संहारक शक्ती विनाशकारी ठरू शकतात. आपल्या मनात अज्ञानाचा शत्रू दडलेला आहे. तो आळसरूपी अजगरच मनाभोवती वेटाळे घालून बसला आहे. ते घालवण्यासाठी एक आध्यात्मिक शक्तीचे तेज मनात नवचैतन्य निर्माण करते. त्या चैतन्यांनीच सर्व भेदभाव मिटतील. तेच चैतन्य जीवनातील अनंत अडचणी सोडवण्यास मदत करेल. त्या चैतन्य शक्तीचे तेज साक्षात विश्ववृत्तीचे अनंत दृश्य दाखवते. ते दृश्य दिसण्यासाठी नव्या उत्साहाने मानवतेच्या शिकवणीचा ध्यास घेतला पाहिजे. तीच खरी शिकवण ठरेल. ती शक्ती आध्यात्मिकतेत आहे.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक