शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेच्या शिकवणीचा ध्यास घेतला पाहिजे. तीच खरी शिकवण ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:48 IST

जवळ-जवळ सर्व माणसे कोणत्या तरी पूर्वग्रही गटाचे सदस्यत्व पत्करून आयुष्य जगतात. त्या वेगवेगळ्या गटांच्या मूळ सिद्धांतात विलक्षण फरक आढळतो.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

मानवतेशी एकनिष्ठ राहण्याची संस्कृती प्रबळ झाली पाहिजे. मानवाने धर्मा-धर्मामधील तेढ कमी केला पाहिजे. बालकामध्ये किंवा शालेय जीवनात याची जाणीव करून दिली जावी. मानवतेचे मार्गदर्शन करणारे शिक्षण मिळावे. एकमेकांच्या संस्कृतीबद्दल जिज्ञासा ठेवल्यास मानवजात एकतेच्या शिखराकडे वाटचाल करेल. तेव्हा जो प्रमुख देव म्हणजे परमात्मा त्याचे स्पष्ट रूप लक्षात येईल. साध्याभोळ्या लोकांच्या मनातला भेदभाव निटावा. विज्ञानाच्या वेगवेगळ्या मर्यादित क्षेत्रांमध्ये बेजबाबदार मानवाने विनाकारण खटपट करू नये. त्याचे फळ एका भयंकर आत्मघातकी शक्तीच्या रूपाने प्रकट होते. त्या समस्या आपल्याला भेडसावत असतात.

जवळ-जवळ सर्व माणसे कोणत्या तरी पूर्वग्रही गटाचे सदस्यत्व पत्करून आयुष्य जगतात. त्या वेगवेगळ्या गटांच्या मूळ सिद्धांतात विलक्षण फरक आढळतो. आपसांतल्या भांडणात बुद्धी-शक्ती आणि इतर साधनसामग्री व्यर्थ घालवल्यामुळे आम्ही सर्व आता समस्याग्रस्त आहोत. प्रत्येक गटाचे पुढारी- स्वत:ला विद्वान समजतात. विद्वान संत, शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनी लिहून ठेवलेल्या सर्व चेतवण्यांकडे मात्र ते दुर्लक्ष करतात. आजही असे दिसून येते की सामान्य माणसाच्या आकलनशक्तीत असे दिसून येते की, सामान्य माणसाच्या आकलनशक्तीत वाढ झाली असली तरी, ती एवढी नाही की आधुनिक म्हणवून घेणाऱ्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांप्रमाणे विचार करतील. मानवाला महानतेची शिकवण देणे महत्त्वाचे आहे. पूर्वकालीन संतांना मानवतेच्या महानतेचे गणित सामान्य जनतेच्या मनात ढळकपणे मांडता आले. पण कमकुवत आकलनशक्तीच्या बांधवास समजून घेण्याची वृत्ती असली, सांभाळून घेण्याची समज असली, तर बुद्धिप्रामाण्यवादी परंपरा आणि आधुनिक विज्ञाननिष्ठ विचार यांचा योग नक्कीच घडवून आणेल. आजच्या या भीषण जागतिक समस्येने मनुष्यजातीला ग्रासले आहे. मानवाने निर्माण केलेल्या संहारक शक्ती विनाशकारी ठरू शकतात. आपल्या मनात अज्ञानाचा शत्रू दडलेला आहे. तो आळसरूपी अजगरच मनाभोवती वेटाळे घालून बसला आहे. ते घालवण्यासाठी एक आध्यात्मिक शक्तीचे तेज मनात नवचैतन्य निर्माण करते. त्या चैतन्यांनीच सर्व भेदभाव मिटतील. तेच चैतन्य जीवनातील अनंत अडचणी सोडवण्यास मदत करेल. त्या चैतन्य शक्तीचे तेज साक्षात विश्ववृत्तीचे अनंत दृश्य दाखवते. ते दृश्य दिसण्यासाठी नव्या उत्साहाने मानवतेच्या शिकवणीचा ध्यास घेतला पाहिजे. तीच खरी शिकवण ठरेल. ती शक्ती आध्यात्मिकतेत आहे.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक