शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आनंद तरंग - शास्त्रग्रंथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 01:51 IST

पहिल्या अध्यायाचा विचार केल्यास त्यात उदाहरण असणारा अर्जुन स्वत:चा स्वभावत: असणारा जो क्षत्रिय धर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे

सौरभ कुलकर्णी

श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाला वेदांचे सार असे म्हटले जाते. संपूर्ण वेद हे आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवितात. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान त्यात असते. जीवनशैलीवर त्याचा प्रभाव असतो. म्हणूनच त्यांना शास्त्र असेही म्हटले जाते. त्याप्रमाणे श्रीमद्भगवदग्ीतेलाही ते एक शास्त्र आहे, असे म्हटले जाते. कारण यात भगवान वेदव्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाद्वारा, तसेच अर्जुनाला उदाहरण म्हणून घेऊन जीवनाची सोपी पद्धती अठरा अध्यायांच्या द्वारा समजावून सांगितली आहे. जीवनात अनेकदा कठीण वाटणारे प्रश्न पडतात. भगवद्गीतेत त्याची उत्तरे सापडतात अन् आपला मार्ग मोकळा होतो. म्हणून श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाला शास्त्र असे म्हटले जाऊ शकते. या ग्रंथाची निर्मिती कर्ममार्ग, उपासनामार्ग, तसेच ज्ञानमार्ग असे जीवनातील प्रश्नांवर तोडगा देणारे तीन मार्ग सांगण्यासाठी केली आहे.

पहिल्या अध्यायाचा विचार केल्यास त्यात उदाहरण असणारा अर्जुन स्वत:चा स्वभावत: असणारा जो क्षत्रिय धर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे ते करण्यासाठी प्रवृत्त झालेला असला तरीही समोर आप्तस्वकीय, अगदी जवळचे लोक आहेत हे त्याने पाहिले तेव्हा त्याचा निश्चय ढळायला सुरुवात झाली. स्वकीयांसोबतच युद्ध कसे करायचे, त्यांचा पराभव करण्यासाठी कसे लढायचे, असे प्रश्न त्याला पडले, असे पहिल्या अध्यायात सांगितलेय. रोजच्या व्यवहारात आपणही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा काही कारणांमुळे असे वाटू शकते की, मी जे करीत आहे ते अगदी योग्य करतो आहे का अयोग्य? तेव्हा आपला उद्देश योग्य असेल व तो पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या मार्गात कोणाबद्दलही शारीरिक, मानसिक, वाचिक हिंसा घडू नये. मात्र, तसे करणे काही अपरिहार्य कारणांमुळे होत असेल तर तेवढ्या गोष्टींसाठी त्याची व ईश्वराची माफी मागून योग्य म्हणजेच सर्वांसाठी हितकारक अशा गोष्टी आपण आयुष्यभर करीत राहणे, हे अर्जुनाच्या दृष्टांताने आपल्याला या ग्रंथातून शिकायचे आहे. म्हणून हा एक उत्तम शास्त्रग्रंथ आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक