शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - शास्त्रग्रंथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 01:51 IST

पहिल्या अध्यायाचा विचार केल्यास त्यात उदाहरण असणारा अर्जुन स्वत:चा स्वभावत: असणारा जो क्षत्रिय धर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे

सौरभ कुलकर्णी

श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाला वेदांचे सार असे म्हटले जाते. संपूर्ण वेद हे आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवितात. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान त्यात असते. जीवनशैलीवर त्याचा प्रभाव असतो. म्हणूनच त्यांना शास्त्र असेही म्हटले जाते. त्याप्रमाणे श्रीमद्भगवदग्ीतेलाही ते एक शास्त्र आहे, असे म्हटले जाते. कारण यात भगवान वेदव्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाद्वारा, तसेच अर्जुनाला उदाहरण म्हणून घेऊन जीवनाची सोपी पद्धती अठरा अध्यायांच्या द्वारा समजावून सांगितली आहे. जीवनात अनेकदा कठीण वाटणारे प्रश्न पडतात. भगवद्गीतेत त्याची उत्तरे सापडतात अन् आपला मार्ग मोकळा होतो. म्हणून श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाला शास्त्र असे म्हटले जाऊ शकते. या ग्रंथाची निर्मिती कर्ममार्ग, उपासनामार्ग, तसेच ज्ञानमार्ग असे जीवनातील प्रश्नांवर तोडगा देणारे तीन मार्ग सांगण्यासाठी केली आहे.

पहिल्या अध्यायाचा विचार केल्यास त्यात उदाहरण असणारा अर्जुन स्वत:चा स्वभावत: असणारा जो क्षत्रिय धर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे ते करण्यासाठी प्रवृत्त झालेला असला तरीही समोर आप्तस्वकीय, अगदी जवळचे लोक आहेत हे त्याने पाहिले तेव्हा त्याचा निश्चय ढळायला सुरुवात झाली. स्वकीयांसोबतच युद्ध कसे करायचे, त्यांचा पराभव करण्यासाठी कसे लढायचे, असे प्रश्न त्याला पडले, असे पहिल्या अध्यायात सांगितलेय. रोजच्या व्यवहारात आपणही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा काही कारणांमुळे असे वाटू शकते की, मी जे करीत आहे ते अगदी योग्य करतो आहे का अयोग्य? तेव्हा आपला उद्देश योग्य असेल व तो पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या मार्गात कोणाबद्दलही शारीरिक, मानसिक, वाचिक हिंसा घडू नये. मात्र, तसे करणे काही अपरिहार्य कारणांमुळे होत असेल तर तेवढ्या गोष्टींसाठी त्याची व ईश्वराची माफी मागून योग्य म्हणजेच सर्वांसाठी हितकारक अशा गोष्टी आपण आयुष्यभर करीत राहणे, हे अर्जुनाच्या दृष्टांताने आपल्याला या ग्रंथातून शिकायचे आहे. म्हणून हा एक उत्तम शास्त्रग्रंथ आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक