शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आनंद तरंग - शास्त्रग्रंथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 01:51 IST

पहिल्या अध्यायाचा विचार केल्यास त्यात उदाहरण असणारा अर्जुन स्वत:चा स्वभावत: असणारा जो क्षत्रिय धर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे

सौरभ कुलकर्णी

श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाला वेदांचे सार असे म्हटले जाते. संपूर्ण वेद हे आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवितात. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान त्यात असते. जीवनशैलीवर त्याचा प्रभाव असतो. म्हणूनच त्यांना शास्त्र असेही म्हटले जाते. त्याप्रमाणे श्रीमद्भगवदग्ीतेलाही ते एक शास्त्र आहे, असे म्हटले जाते. कारण यात भगवान वेदव्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाद्वारा, तसेच अर्जुनाला उदाहरण म्हणून घेऊन जीवनाची सोपी पद्धती अठरा अध्यायांच्या द्वारा समजावून सांगितली आहे. जीवनात अनेकदा कठीण वाटणारे प्रश्न पडतात. भगवद्गीतेत त्याची उत्तरे सापडतात अन् आपला मार्ग मोकळा होतो. म्हणून श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाला शास्त्र असे म्हटले जाऊ शकते. या ग्रंथाची निर्मिती कर्ममार्ग, उपासनामार्ग, तसेच ज्ञानमार्ग असे जीवनातील प्रश्नांवर तोडगा देणारे तीन मार्ग सांगण्यासाठी केली आहे.

पहिल्या अध्यायाचा विचार केल्यास त्यात उदाहरण असणारा अर्जुन स्वत:चा स्वभावत: असणारा जो क्षत्रिय धर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे ते करण्यासाठी प्रवृत्त झालेला असला तरीही समोर आप्तस्वकीय, अगदी जवळचे लोक आहेत हे त्याने पाहिले तेव्हा त्याचा निश्चय ढळायला सुरुवात झाली. स्वकीयांसोबतच युद्ध कसे करायचे, त्यांचा पराभव करण्यासाठी कसे लढायचे, असे प्रश्न त्याला पडले, असे पहिल्या अध्यायात सांगितलेय. रोजच्या व्यवहारात आपणही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा काही कारणांमुळे असे वाटू शकते की, मी जे करीत आहे ते अगदी योग्य करतो आहे का अयोग्य? तेव्हा आपला उद्देश योग्य असेल व तो पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या मार्गात कोणाबद्दलही शारीरिक, मानसिक, वाचिक हिंसा घडू नये. मात्र, तसे करणे काही अपरिहार्य कारणांमुळे होत असेल तर तेवढ्या गोष्टींसाठी त्याची व ईश्वराची माफी मागून योग्य म्हणजेच सर्वांसाठी हितकारक अशा गोष्टी आपण आयुष्यभर करीत राहणे, हे अर्जुनाच्या दृष्टांताने आपल्याला या ग्रंथातून शिकायचे आहे. म्हणून हा एक उत्तम शास्त्रग्रंथ आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक