शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

आनंद तरंग - विषयांचे कुरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 01:13 IST

इंद्रियांना जेव्हा विषय सेवनाचे वळणच पडून जाते, तेव्हा संबंधित विषयाची पूर्तता झाली तर आनंद निर्माण होतो

प्रा. शिवाजीराव भुकेलेरिमझिम बरसणाऱ्या सरीने धरणीमातेवर हिरवीगार शाल पांघरावी, लवलवत्या तृण पात्यांनी आपल्या रसिल्या रूपात साºया पशू-पक्ष्यांना आणि माणसाससुद्धा साद घालावी; पण एखाद्या मालकाने तरण्याबांड ‘खोंडास’ हिरव्या कुरणाजवळच खुंटाला बांधावे; पण भुकेचा आगडोंब उसळू लागला अन् हिरव्यागार गालिचाचे ‘कुरण’ खुणावू लागले की, ‘खोंड’ खुंट्यासहित आणि ‘दाव्या’सहित उसळी घेऊन हिरव्या कुरणावर ताव मारते. आता यात दोष त्या ‘खोंडाचा’ की त्याच्या मालकाचा, हा प्रश्न अलहिदा; पण आज अध्यात्माच्या नावाखाली विषय दमनाच्या ‘खुंट्याला’ सर्वसामान्यास बांधणाºया अनेक महागुरूंची अवस्था त्या मालकासारखी आणि शिष्यांच्या भाऊगर्दीची अवस्था तरण्याबांड खोंडासारखी झाली आहे. एकेकाळी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच विषयांवर साधक जाता-जाता विजय मिळवायचा; कारण त्याच्याभोवती विषयरूपी हिरवेगार कुरण खूपच कमी प्रमाणात असायचे; पण आज मात्र सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सुरा, सुंदरी यांची हिरवीगार कुरणे साधक आणि सिद्ध म्हणवून घेणाºया मंडळींच्या भोवतीने नंगानाच घालीत आहेत. यामुळे गुरूच विषय विकारात गुरफटले जात आहेत. त्यावर बाजी मारण्याचे काम शिष्य करीत आहेत. या विषयाकडे धाव घेण्यापूर्वी ती मनातच येऊ नयेत, अशी प्रार्थना करताना विश्वज्योती महात्मा बसवेश्वर म्हणाले होते -विषयरूपी हिरवेगार कुरण, आणुनी माझ्यापुढेपशूला काय कळते, ते तर हिरवळीकडे ओढ घेणारचविषयरहित करूनि, भक्ती रस आकंठ पाजुनीकृपादृष्टीने पहा हे कुडलसंगम देवा ॥संयमाचे बांध सैल झाले की, इंद्रियांना पंचविषय प्राणापेक्षाही प्राणप्रिय वाटू लागतात, असे म्हणतात. कावीळ झालेल्या माणसाला सारे जगच पिवळे दिसायला लागते, तसे विषयभक्त परायणमंडळींना सारे जगच विषयासक्त वाटायला लागते. स्वार्थ, संपत्ती, सौंदर्य व सत्तेच्या विषयाची धुंदी चढली की, आपल्या पलीकडचे सारे जगच धूसर वाटायला लागते. इंद्रियांना जेव्हा विषय सेवनाचे वळणच पडून जाते, तेव्हा संबंधित विषयाची पूर्तता झाली तर आनंद निर्माण होतो अन् पूर्तता नाही झाली तर निर्माण होणारा विवाद आपल्याला नाही तर कुणालाच नाही, या भावनेने सभोवतालच्या वातावरणाला अशांततेची चूड लावतो. मानवास शाश्वत सुख देणे हा मुळात विषयाचा धर्मच नाही. जसे रोहिणी नक्षत्रात डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी निर्माण झालेले मृगजळ पाहून ‘मृगास’ वाटते, या ‘मृगजळा’च्या गंगेत पाणी पिल्यावर आपली तहान निश्चित भागेल. म्हणून ते सैरावैरा धावू लागते व धावून-धावून ऊर फुटून मरून जाते. अगदी तसेच विषयाच्या मृगजळापाठीमागे धावून सुख मिळेल म्हणून विषयी माणसे रात्रंदिवस त्या पाठीमागे धावत राहतात आणि अपूर्णतेच्या शापातच मरून जातात. सुख आणि विषय यांचा तसा अर्थाअर्थी कुठेही संबंध नाही. नव्हे, विषयामुळे साधा सुखाचा भाससुद्धा निर्माण होत नाही. कारण परमसत्याचा शोध घेण्यासाठी केला जाणारा विचार हाच शाश्वत सुखाचा राजमार्ग आहे. जर तिथंपर्यंत आपणास पोहोचता येत नसेल, तर विषय सुखाचा कौटुंबिक मर्यादेत उपयोग घेऊन हळूहळू त्या परम सत्याच्या जवळपास तरी पोहोचण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खºया अर्थाने पारमार्थिक होणे होय; परंतु परमार्थाच्या नावाखाली आज प्रापंचिक माणसास ‘हीन’ ठरवून भोगासाठी भजने करणारी आणि संतसंगाचे महामेळावे घेणारी मंडळीच परमार्थाच्या क्षेत्रात विषयाचा धागडधिंंगा घालीत आहेत.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक