शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

आनंद तरंग - विषयांचे कुरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 01:13 IST

इंद्रियांना जेव्हा विषय सेवनाचे वळणच पडून जाते, तेव्हा संबंधित विषयाची पूर्तता झाली तर आनंद निर्माण होतो

प्रा. शिवाजीराव भुकेलेरिमझिम बरसणाऱ्या सरीने धरणीमातेवर हिरवीगार शाल पांघरावी, लवलवत्या तृण पात्यांनी आपल्या रसिल्या रूपात साºया पशू-पक्ष्यांना आणि माणसाससुद्धा साद घालावी; पण एखाद्या मालकाने तरण्याबांड ‘खोंडास’ हिरव्या कुरणाजवळच खुंटाला बांधावे; पण भुकेचा आगडोंब उसळू लागला अन् हिरव्यागार गालिचाचे ‘कुरण’ खुणावू लागले की, ‘खोंड’ खुंट्यासहित आणि ‘दाव्या’सहित उसळी घेऊन हिरव्या कुरणावर ताव मारते. आता यात दोष त्या ‘खोंडाचा’ की त्याच्या मालकाचा, हा प्रश्न अलहिदा; पण आज अध्यात्माच्या नावाखाली विषय दमनाच्या ‘खुंट्याला’ सर्वसामान्यास बांधणाºया अनेक महागुरूंची अवस्था त्या मालकासारखी आणि शिष्यांच्या भाऊगर्दीची अवस्था तरण्याबांड खोंडासारखी झाली आहे. एकेकाळी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच विषयांवर साधक जाता-जाता विजय मिळवायचा; कारण त्याच्याभोवती विषयरूपी हिरवेगार कुरण खूपच कमी प्रमाणात असायचे; पण आज मात्र सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सुरा, सुंदरी यांची हिरवीगार कुरणे साधक आणि सिद्ध म्हणवून घेणाºया मंडळींच्या भोवतीने नंगानाच घालीत आहेत. यामुळे गुरूच विषय विकारात गुरफटले जात आहेत. त्यावर बाजी मारण्याचे काम शिष्य करीत आहेत. या विषयाकडे धाव घेण्यापूर्वी ती मनातच येऊ नयेत, अशी प्रार्थना करताना विश्वज्योती महात्मा बसवेश्वर म्हणाले होते -विषयरूपी हिरवेगार कुरण, आणुनी माझ्यापुढेपशूला काय कळते, ते तर हिरवळीकडे ओढ घेणारचविषयरहित करूनि, भक्ती रस आकंठ पाजुनीकृपादृष्टीने पहा हे कुडलसंगम देवा ॥संयमाचे बांध सैल झाले की, इंद्रियांना पंचविषय प्राणापेक्षाही प्राणप्रिय वाटू लागतात, असे म्हणतात. कावीळ झालेल्या माणसाला सारे जगच पिवळे दिसायला लागते, तसे विषयभक्त परायणमंडळींना सारे जगच विषयासक्त वाटायला लागते. स्वार्थ, संपत्ती, सौंदर्य व सत्तेच्या विषयाची धुंदी चढली की, आपल्या पलीकडचे सारे जगच धूसर वाटायला लागते. इंद्रियांना जेव्हा विषय सेवनाचे वळणच पडून जाते, तेव्हा संबंधित विषयाची पूर्तता झाली तर आनंद निर्माण होतो अन् पूर्तता नाही झाली तर निर्माण होणारा विवाद आपल्याला नाही तर कुणालाच नाही, या भावनेने सभोवतालच्या वातावरणाला अशांततेची चूड लावतो. मानवास शाश्वत सुख देणे हा मुळात विषयाचा धर्मच नाही. जसे रोहिणी नक्षत्रात डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी निर्माण झालेले मृगजळ पाहून ‘मृगास’ वाटते, या ‘मृगजळा’च्या गंगेत पाणी पिल्यावर आपली तहान निश्चित भागेल. म्हणून ते सैरावैरा धावू लागते व धावून-धावून ऊर फुटून मरून जाते. अगदी तसेच विषयाच्या मृगजळापाठीमागे धावून सुख मिळेल म्हणून विषयी माणसे रात्रंदिवस त्या पाठीमागे धावत राहतात आणि अपूर्णतेच्या शापातच मरून जातात. सुख आणि विषय यांचा तसा अर्थाअर्थी कुठेही संबंध नाही. नव्हे, विषयामुळे साधा सुखाचा भाससुद्धा निर्माण होत नाही. कारण परमसत्याचा शोध घेण्यासाठी केला जाणारा विचार हाच शाश्वत सुखाचा राजमार्ग आहे. जर तिथंपर्यंत आपणास पोहोचता येत नसेल, तर विषय सुखाचा कौटुंबिक मर्यादेत उपयोग घेऊन हळूहळू त्या परम सत्याच्या जवळपास तरी पोहोचण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खºया अर्थाने पारमार्थिक होणे होय; परंतु परमार्थाच्या नावाखाली आज प्रापंचिक माणसास ‘हीन’ ठरवून भोगासाठी भजने करणारी आणि संतसंगाचे महामेळावे घेणारी मंडळीच परमार्थाच्या क्षेत्रात विषयाचा धागडधिंंगा घालीत आहेत.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक