शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आनंद तरंग: गुरूची गरज नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 03:15 IST

मानवजातसुद्धा एक प्रकारचे निसर्गतत्त्व आहे. परंतु ज्याप्रकारे इतर घटक नि:स्वार्थ होऊन कार्यरत आहेत त्याउलट मानव वागण्याचा प्रयत्न करतो आहे.

विजयराज बोधनकर

नदीचे पाणी प्यायल्यानंतर अद्याप नदी पाण्याचे पैसे मागत नाही. कारण अद्याप नदीवर मालकी हक्क सांगण्याची कुणाची हिंमत झाली नाही. पावसाने कधीच पाण्याचे बिल पाठवले नाही. कारण अजून पावसाला कुणी विकत घेऊ शकले नाही. कारण हा निसर्गस्रोत स्वार्थासाठी राबत नसून एका नि:स्वार्थी ईश्वरी व्यवस्थेचा अनंत काळापासूनचा न उलगडणारा प्रवास आहे. याच निसर्ग व्यवस्थेचा मानव एक भाग आहे. मानवजातसुद्धा एक प्रकारचे निसर्गतत्त्व आहे. परंतु ज्याप्रकारे इतर घटक नि:स्वार्थ होऊन कार्यरत आहेत त्याउलट मानव वागण्याचा प्रयत्न करतो आहे. लाखो वर्षांपासून लोभ, वासना, स्वार्थ, अधर्म, अशी अनेक दुष्कृत्यं करीत आल्यामुळे या भूमीवर पाप नावाचा एक जटिल प्रश्न उभा आहे आणि आजही तो अनुत्तरित आहे. तो प्रश्न सोडवायचा झाल्यास प्रत्येक बुद्धिवान जीवाने मानवाची दांभिक विचारधारा स्वीकारण्यापेक्षा निसर्गाची तत्त्वं अंगीकारली तर मानव अनेक संकटांतून मुक्त होऊ शकतो. पाखंडी मानवानेच मानवाला फसविण्यासाठी अनेक क्लृप्त्या शोधून काढून हजारो वर्षापासून साध्या भोळ्या समाजाला अधोगतीकडे नेणाऱ्या विचारधारेत जखडून ठेवले आहे. त्यामुळे मानवाची बौद्धिक पातळी खुंटली आहे. निसर्गाला कुठल्या गुरूची गरज लागत नाही तशी मानवालासुद्धा कुठल्या गुरूच्या मंत्राची गरज नाही. कारण शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे फक्त पुस्तकी शिक्षण असतं. त्याचा अनुभूतीशी काही एक संबंध नसतो. त्याउलट स्वयं शिक्षण हेच खरं शिक्षण मानवाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकतं. फक्त स्वयं शिक्षणाची सवय मानवाने लावून घेतली पाहिजे. चिमणी स्वयं शिक्षणाने खोपा तयार करते. तिला त्याचे शिक्षण अंतस्फूर्तीने मिळते. म्हणजेच पुस्तकी शिक्षणापेक्षाही स्वयं शिक्षण किती विकासाच्या मार्गाने घेऊन जाऊ शकतं याची अनुभूती तिथे आल्याखेरीज राहत नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक