शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मन:शक्ती प्रबळ असली की मनुष्य ठरतो श्रेष्ठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 08:27 IST

मनुष्याचा स्वभाव त्याच्या मनावरून ठरतो. परस्पर प्रेम आणि सद्भावना याचाही परिचय मनावरच अवलंबून असतो. महान तेजस्वी आणि सामर्थ्यवान कर्म करने, हीसुद्धा मनाचीच शक्ती असते. मोक्षप्राप्ती असो अथवा उन्नती असो या सर्वांना कारणीभूत मन असते.

मनुष्याचा स्वभाव त्याच्या मनावरून ठरतो. परस्पर प्रेम आणि सद्भावना याचाही परिचय मनावरच अवलंबून असतो. महान तेजस्वी आणि सामर्थ्यवान कर्म करने, हीसुद्धा मनाचीच शक्ती असते. मोक्षप्राप्ती असो अथवा उन्नती असो या सर्वांना कारणीभूत मन असते. आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना किंवा कृती याचा अनुमान मनावरच असतो. मन:शक्ती प्रबळ असली की मनुष्य श्रेष्ठ ठरतो. मनुष्याचे प्रयत्न त्या मन:शक्तीशी एकरूप व्हावे लागतात. तेव्हाच उत्तम गुणांनी, विद्वत्तेने एखादी चांगली कृती घडते. आपली बुद्धी सात्त्विक बनावयची असेल तर मनानी सत्कर्म केले पाहिजे. मन एकदा सात्त्विक बनले की विनाशकारी गोष्टींचे भय राहात नाही. सत्य मार्गावर चालून आत्मिक उन्नती साधली जाते. प्रकृती नियमानुसार मनुष्याची हानी, लाभ, शुभ-अशुभ दिव्य शक्ती, असुरी शक्ती, पाप भावना निंदायोग्य दुष्कर्म, परब्रह्माचे ज्ञान, भौतिक विज्ञान, आत्मिक तत्त्वज्ञान इत्यादी गोष्टींचे मूल्यमापन मनुष्याच्या मनावरून ठरते. कारण मन चांगले असले की सात्त्विक विचार निर्माण होतात.

सात्त्विक विचार मनुष्याच्या पुरुषार्थाला लक्ष्य बनवतात. मनुष्य स्वयं आपल्या मनानुसार वागतो. काही गोष्टी मनासारख्या होतात, तर काही मनाविरुद्ध घडतात. अशावेळी मनावर लगाम घातला पाहिजे. कारण ऋग्वेदात म्हटले आहे ‘मनुष्य ज्या गोष्टीत मन लावतो, ती गोष्ट, तो पुरुषार्थ प्राप्त करत असतो.’ म्हणून योग्य गोष्टीकडे मनाला लावा. मग मनातून विषय भोग, चिंता, दु:ख नष्ट होतील अन् विश्वासपूर्वक आनंद उपभोगाल! मनुष्य जीवनात अनेक अडचणी येतात. या सर्वांवर मात करून आपण आपला मार्ग अवलंबावा आणि विश्वासपूर्वक जीवन जगावे. व्यर्थ शोक न करता, उन्माद न करता शुद्ध स्वरूपात जीवन जगा म्हणजे आपल्या लक्ष्यावर मन केंद्रित करा. अन् सुख-शांतीचा मार्ग अवलंबावा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक