शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मन:शक्ती प्रबळ असली की मनुष्य ठरतो श्रेष्ठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 08:27 IST

मनुष्याचा स्वभाव त्याच्या मनावरून ठरतो. परस्पर प्रेम आणि सद्भावना याचाही परिचय मनावरच अवलंबून असतो. महान तेजस्वी आणि सामर्थ्यवान कर्म करने, हीसुद्धा मनाचीच शक्ती असते. मोक्षप्राप्ती असो अथवा उन्नती असो या सर्वांना कारणीभूत मन असते.

मनुष्याचा स्वभाव त्याच्या मनावरून ठरतो. परस्पर प्रेम आणि सद्भावना याचाही परिचय मनावरच अवलंबून असतो. महान तेजस्वी आणि सामर्थ्यवान कर्म करने, हीसुद्धा मनाचीच शक्ती असते. मोक्षप्राप्ती असो अथवा उन्नती असो या सर्वांना कारणीभूत मन असते. आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना किंवा कृती याचा अनुमान मनावरच असतो. मन:शक्ती प्रबळ असली की मनुष्य श्रेष्ठ ठरतो. मनुष्याचे प्रयत्न त्या मन:शक्तीशी एकरूप व्हावे लागतात. तेव्हाच उत्तम गुणांनी, विद्वत्तेने एखादी चांगली कृती घडते. आपली बुद्धी सात्त्विक बनावयची असेल तर मनानी सत्कर्म केले पाहिजे. मन एकदा सात्त्विक बनले की विनाशकारी गोष्टींचे भय राहात नाही. सत्य मार्गावर चालून आत्मिक उन्नती साधली जाते. प्रकृती नियमानुसार मनुष्याची हानी, लाभ, शुभ-अशुभ दिव्य शक्ती, असुरी शक्ती, पाप भावना निंदायोग्य दुष्कर्म, परब्रह्माचे ज्ञान, भौतिक विज्ञान, आत्मिक तत्त्वज्ञान इत्यादी गोष्टींचे मूल्यमापन मनुष्याच्या मनावरून ठरते. कारण मन चांगले असले की सात्त्विक विचार निर्माण होतात.

सात्त्विक विचार मनुष्याच्या पुरुषार्थाला लक्ष्य बनवतात. मनुष्य स्वयं आपल्या मनानुसार वागतो. काही गोष्टी मनासारख्या होतात, तर काही मनाविरुद्ध घडतात. अशावेळी मनावर लगाम घातला पाहिजे. कारण ऋग्वेदात म्हटले आहे ‘मनुष्य ज्या गोष्टीत मन लावतो, ती गोष्ट, तो पुरुषार्थ प्राप्त करत असतो.’ म्हणून योग्य गोष्टीकडे मनाला लावा. मग मनातून विषय भोग, चिंता, दु:ख नष्ट होतील अन् विश्वासपूर्वक आनंद उपभोगाल! मनुष्य जीवनात अनेक अडचणी येतात. या सर्वांवर मात करून आपण आपला मार्ग अवलंबावा आणि विश्वासपूर्वक जीवन जगावे. व्यर्थ शोक न करता, उन्माद न करता शुद्ध स्वरूपात जीवन जगा म्हणजे आपल्या लक्ष्यावर मन केंद्रित करा. अन् सुख-शांतीचा मार्ग अवलंबावा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक