शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

संतांच्या जीवनकार्याचा आरसा म्हणजे मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 08:51 IST

मनापासून संतस्तुती करणे आपल्या यशस्वी साफल्यासाठी सर्वसुलभ असते. नामसंकीर्तनाची महती करणे असले की, सगुण-निर्गुण भक्ती असेल, या सर्वांसाठी ‘मन’ महत्त्वाची भूमिका बजावते.

मनापासून संतस्तुती करणे आपल्या यशस्वी साफल्यासाठी सर्वसुलभ असते. नामसंकीर्तनाची महती करणे असले की, सगुण-निर्गुण भक्ती असेल, या सर्वांसाठी ‘मन’ महत्त्वाची भूमिका बजावते. मनाचा आविष्कार निरनिराळा असला तरी त्याचा परिमाण निश्चितपणे वेगळा जाणवतो. प्रत्येक भूमिकेसाठी मनाचा नितांत रमणीय असा भावविशेष असतो. संतमंडळी आपल्याा मनाला आपल्या उपास्य वैदताबरोबर प्रेमाने राहायला सांगतात. मनाच्या करुणेतून भक्तिपेमाचा पाझर फोडतात. त्यांची पदे किंवा अभंगवाणी मनाचा अविर्भाव असतो. सतत चिंतन-मनन करणारे ‘मन’ साहित्यातून प्रकट होते. वाडमयाद्वारे संताचे मन जाणता येते. भक्त आणि भगवंत यांच्या विरहभावातून मनाची कल्पना मांडता येते. तत्कालीन परिस्थितीचे पडसाद उमटलेले असतात. संताचे अंतरंग बारकाईने अवलोकन केले तर त्यांच्या समर्थ व विचारी मनाचा ठाव घेता येतो. संतानी माता-पिता, गुरु धेनू-वत्स, समाज यातील अनेक उदाहरणातून संताच्या हळव्या व परिवर्तनवादी मनाचा मूलमंत्र व्यक्त झालेला दिसतो.

संताच्या जीवनकार्याचा व वाडमयीन वैशिष्ट्यांचा आरसा म्हणजे त्यांचे सामर्थ्यशील मन होय. संताचे विचारमंथन मनाला सर्वांगीण जीवनाच्या वाटेवर जाण्यासप्रवर्त करते. अंत:करणातील खऱ्या इश्वरतत्वांचा शोध मनाच्याद्वारेच घेता येतो. ‘‘जो-वरी-मी-माझे न तुटे-तंव आत्माराम कैसेनि तून जाणवत असतो. संताच्या मनाचा भाव प्रेमरसगोडी निर्माण करतो. देव-भक्तपणाच्या कल्पना ते न अनुभवते. आत्मानंदी रंगलेल्या मनाला निरुपम असा हृयसंवाद साधता येतो. संताचे ‘मन’ पावन झालेले असते. त्यांच्या मनातून स्पष्ट विचार बाहेर पडतात. प्रसंग ते देवाला प्रेमाने आळवतात व प्रसंगी कोमल शब्दाऐवजी परखडपणे बोलताना दिसतात. समाजाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी संतमनाची नितांत गरज आहे. एका विशिष्ट ठिकाणी मनात उत्स्फूर्त झालेल्या भावनेला किंवा विचाराला नियंत्रणात संताचे मन आणू शकते. त्यांचा विचार त्या काळात प्रभावी ठरतो. म्हणून संत मनाची-संतसंगतीची इच्छा सदैव सज्जनपुरुष करतात. संताचे मन सूर्यकिरणाप्रमाणे आत्मज्ञानाचा प्रकाश देत असते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक