शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

adhyatmik; वारकरी संप्रदाय म्हणजे सामाजिक क्रांतीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 8:16 PM

वारकरी संप्रदाय म्हणजे एक सामाजिक क्रांतीच होय. संप्रदायाने जातिनिरपेक्ष आध्यात्मिक विचार समाजाला दिले आहेत. वर्णव्यवस्था राखूनही वर्गविग्रहाची वेळ येऊ ...

वारकरी संप्रदाय म्हणजे एक सामाजिक क्रांतीच होय. संप्रदायाने जातिनिरपेक्ष आध्यात्मिक विचार समाजाला दिले आहेत. वर्णव्यवस्था राखूनही वर्गविग्रहाची वेळ येऊ दिली नाही. या वारक-यांमध्ये सर्व जातींचे संत होऊन गेले. सर्व संतांबद्दल वारकºयांच्या मनात तेवढाच भक्तिभाव आणि आदर आहे. त्यांचे कार्य आणि शिकवण हाच तर या संप्रदायाचा मूळ गाभा आहे.

आज इतकी वर्षे लोटली, खेड्यांचे शहरीकरण झाले, शहरांचे औद्योगिकीकरण झाले; पण वारकºयांच्या दिंड्यांचा उत्साह कमी झालेला नाही. कर्मकांडात देव अडकलेला नसून, केवळ भक्तियुक्त नामस्मरणाने तो मिळविता येतो, अशी शिकवण सर्व संतांनी दिली. वारीच्या निमित्ताने सर्व वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येतात. तेच वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ तथा ज्ञानपीठ आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्या वाळवंटात आध्यात्मिक, धार्मिक, तत्त्वज्ञानात्मक शिकवण संतांनी लोकसमूहासमोर मांडली, सामाजिक समन्वयाची शिकवणही वारक-यांना येथेच मिळते.

लौकिक जीवनातील सर्व कर्मे परमेश्वरार्पण बुद्धीने करणे, पारमार्थिक जीवनाचा विकास करणे, समाजाची एकसंधता टिकवण्याचा प्रयत्न या वारकरी संप्रदायाने केला आहे. या विज्ञान युगातदेखील वारी टिकून आहे. या वारीत आजही शिकलेले, न शिकलेले, सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष सहभागी होतात, हेच वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठत्व, पयार्याने चिरंजीवित्व आहे, हे मान्य करावे लागेल.ह.भ.प वसंतराव कासे महाराज,सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर