शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

adhyatmik; वारकरी संप्रदाय म्हणजे सामाजिक क्रांतीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:17 IST

वारकरी संप्रदाय म्हणजे एक सामाजिक क्रांतीच होय. संप्रदायाने जातिनिरपेक्ष आध्यात्मिक विचार समाजाला दिले आहेत. वर्णव्यवस्था राखूनही वर्गविग्रहाची वेळ येऊ ...

वारकरी संप्रदाय म्हणजे एक सामाजिक क्रांतीच होय. संप्रदायाने जातिनिरपेक्ष आध्यात्मिक विचार समाजाला दिले आहेत. वर्णव्यवस्था राखूनही वर्गविग्रहाची वेळ येऊ दिली नाही. या वारक-यांमध्ये सर्व जातींचे संत होऊन गेले. सर्व संतांबद्दल वारकºयांच्या मनात तेवढाच भक्तिभाव आणि आदर आहे. त्यांचे कार्य आणि शिकवण हाच तर या संप्रदायाचा मूळ गाभा आहे.

आज इतकी वर्षे लोटली, खेड्यांचे शहरीकरण झाले, शहरांचे औद्योगिकीकरण झाले; पण वारकºयांच्या दिंड्यांचा उत्साह कमी झालेला नाही. कर्मकांडात देव अडकलेला नसून, केवळ भक्तियुक्त नामस्मरणाने तो मिळविता येतो, अशी शिकवण सर्व संतांनी दिली. वारीच्या निमित्ताने सर्व वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येतात. तेच वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ तथा ज्ञानपीठ आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्या वाळवंटात आध्यात्मिक, धार्मिक, तत्त्वज्ञानात्मक शिकवण संतांनी लोकसमूहासमोर मांडली, सामाजिक समन्वयाची शिकवणही वारक-यांना येथेच मिळते.

लौकिक जीवनातील सर्व कर्मे परमेश्वरार्पण बुद्धीने करणे, पारमार्थिक जीवनाचा विकास करणे, समाजाची एकसंधता टिकवण्याचा प्रयत्न या वारकरी संप्रदायाने केला आहे. या विज्ञान युगातदेखील वारी टिकून आहे. या वारीत आजही शिकलेले, न शिकलेले, सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष सहभागी होतात, हेच वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठत्व, पयार्याने चिरंजीवित्व आहे, हे मान्य करावे लागेल.ह.भ.प वसंतराव कासे महाराज,सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर