शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

adhyatmik; वारकरी संप्रदाय म्हणजे सामाजिक क्रांतीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:17 IST

वारकरी संप्रदाय म्हणजे एक सामाजिक क्रांतीच होय. संप्रदायाने जातिनिरपेक्ष आध्यात्मिक विचार समाजाला दिले आहेत. वर्णव्यवस्था राखूनही वर्गविग्रहाची वेळ येऊ ...

वारकरी संप्रदाय म्हणजे एक सामाजिक क्रांतीच होय. संप्रदायाने जातिनिरपेक्ष आध्यात्मिक विचार समाजाला दिले आहेत. वर्णव्यवस्था राखूनही वर्गविग्रहाची वेळ येऊ दिली नाही. या वारक-यांमध्ये सर्व जातींचे संत होऊन गेले. सर्व संतांबद्दल वारकºयांच्या मनात तेवढाच भक्तिभाव आणि आदर आहे. त्यांचे कार्य आणि शिकवण हाच तर या संप्रदायाचा मूळ गाभा आहे.

आज इतकी वर्षे लोटली, खेड्यांचे शहरीकरण झाले, शहरांचे औद्योगिकीकरण झाले; पण वारकºयांच्या दिंड्यांचा उत्साह कमी झालेला नाही. कर्मकांडात देव अडकलेला नसून, केवळ भक्तियुक्त नामस्मरणाने तो मिळविता येतो, अशी शिकवण सर्व संतांनी दिली. वारीच्या निमित्ताने सर्व वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येतात. तेच वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ तथा ज्ञानपीठ आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्या वाळवंटात आध्यात्मिक, धार्मिक, तत्त्वज्ञानात्मक शिकवण संतांनी लोकसमूहासमोर मांडली, सामाजिक समन्वयाची शिकवणही वारक-यांना येथेच मिळते.

लौकिक जीवनातील सर्व कर्मे परमेश्वरार्पण बुद्धीने करणे, पारमार्थिक जीवनाचा विकास करणे, समाजाची एकसंधता टिकवण्याचा प्रयत्न या वारकरी संप्रदायाने केला आहे. या विज्ञान युगातदेखील वारी टिकून आहे. या वारीत आजही शिकलेले, न शिकलेले, सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष सहभागी होतात, हेच वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठत्व, पयार्याने चिरंजीवित्व आहे, हे मान्य करावे लागेल.ह.भ.प वसंतराव कासे महाराज,सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर