शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अंतरात जशी भावना तसेच मिळते फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 05:38 IST

जशी भावना आपल्या अंतरंगात असेल, तसेच फळ आपणास मिळते. चंद्रकिरणांतून स्रवणाऱ्या अमृतमय आनंदाचा आस्वाद घेण्याऐवजी जर त्याच्यावरचा डाग शोधत बसलो, तर सर्वत्र डागाचेच साम्राज्य दिसेल.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेजशी भावना आपल्या अंतरंगात असेल, तसेच फळ आपणास मिळते. चंद्रकिरणांतून स्रवणाऱ्या अमृतमय आनंदाचा आस्वाद घेण्याऐवजी जर त्याच्यावरचा डाग शोधत बसलो, तर सर्वत्र डागाचेच साम्राज्य दिसेल. भक्तीच्या क्षेत्रातसुद्धा शुद्ध भावाला आत्यंतिक महत्त्व आहे. पदराला पीळ घातला की बापसुद्धा निर्बल होतो, तसे उत्कट भावाने भक्ताने जर भगवंताला साद घातली, तर तो भक्तांच्या जीवनात आनंदाचे माहेरघर निर्माण करतो. सकृतदर्शनी भावाच्या एकत्वाचे जरी वर्णन करण्यातआले असले, तरी भक्ताच्या मनोभूमिकेतील भावाच्या अनन्यतेचे वर्णन करताना श्रीमद् भगवतगीतेमध्ये म्हटले आहे -अनन्य श्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते ।तेषां नित्याभियुक्तांना योग क्षेमं वाहम्यहम ।जे भक्त माझ्या रूप, गुण, कर्मावाचून दुसरे काहीच जाणत नाहीत, अनन्य भावाने माझ्या चरणी सर्वस्व अर्पण करतात, त्यांचा योग-क्षेम वाहण्याचे व त्यांच्या भावनेप्रमाणे फळ देण्याचे कार्य मी करतो. भगवंताच्या या वचनावरूनच सिद्ध होते की, आपल्या आंतरिक ज्ञानरूप परमात्म्याला जाणणाऱ्यांचा वर्ग वेगळा. त्याला फक्त दुरून पाहणाºयांचा वर्ग वेगळा. फक्त ऐकीव माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवणाºया अंधभक्तांचा वर्ग वेगळा. आपल्या देशात तर आज नाना धर्म, पंथ-संप्रदायाचे उदंड पीक आलेले आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आणि माणसानेच माणसाला हीन ठरविल्यामुळे जीवदायक अन्नधान्याचे ‘पीक’ कमी होऊ लागले आहे. वर्षानुवर्षांपासून कोरड्या दुष्काळाची चाहूल लागली आहे; पण पोट पाठीला चिकटलेली माणसेसुद्धा एखाद्या धर्मपंथाच्या पंगतीला जाऊन बसू लागली आहेत, तर श्रीमंत मंडळींचा फावल्या वेळेचा उद्योग म्हणून आज अनेकांच्या सत्संगाचे महोत्सव संपन्न होत आहेत. पण भाव-भक्तीचे विवेकी अधिष्ठान लाभलेले जगद्गुरू तुकोबाराय म्हणाले होते,देखण्याच्या तीन जाती, वेठी वार्ता वर्तन्ती ।भाव तैसे फळ स्वाती तोय एक जळ ।पाहें सांगे आणि जेवीं, अन्तर महदान्तर तेवी ।तुका म्हणे हिरा, पारखिया मूठ गारा । 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक