शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

Adhyatmik; घरचे कुलदैवत हे आईसारखे असते...! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 14:48 IST

घरचे कुलदैवत हे आईसारखे असते, त्याला सोडून लोक भलत्याचीच आराधना करतात. त्यामुळे कुलदेवाचा कोप होतो. कुणी कोणत्या देवाची आराधना ...

ठळक मुद्देकुलदेवतेच्या आराधनेशिवाय केलेल्या इतर देवदेवतांचे पूजन लाभत नाहीकुलदेवाला विसरलात तर कुटुंबाचा उद्धार कधीही होणार नाहीमाणसानाच देव मानून त्यांचा उदोउदो करणे हे योग्य नाही

घरचे कुलदैवत हे आईसारखे असते, त्याला सोडून लोक भलत्याचीच आराधना करतात. त्यामुळे कुलदेवाचा कोप होतो. कुणी कोणत्या देवाची आराधना करावी हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा प्रश्न असतो. त्याच्या श्रद्धा व भक्तीनुसार त्याचे कमी जास्त फळ मिळतेच, पण माणसानाच देव मानून त्यांचा उदोउदो करणे हे योग्य नाही.

कुलदेवतेच्या आराधनेशिवाय केलेल्या इतर देवदेवतांचे पूजन लाभत नाही. कुलदेवाला विसरलात तर कुटुंबाचा उद्धार कधीही होणार नाही. काही कुलदैवत सौम्य तर काही उग्र असतात पण त्यांना डावलून जर इतर पूजाअर्चा, साधूसंतांची आराधना केली तर कुलदेवतेचा कृपाशीर्वाद नसल्याने इतर आराधना म्हणावे तसे यश देऊ शकत नाहीत. ज्यांना कुलदैवत माहित नाही, त्यांनी काय करायचे असा प्रश्न पडतो. गावोगाव फिरत जाणाºया काही लोकांच्याकडून कुलदेव समजते असे म्हणतात पण ते लोक स्वत: अशिक्षित असतात. मग त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असाही प्रश्न पडतो. त्यालाही उपाय आहेत.

ज्याना आपले कुलदैवत माहित नाही त्यानी कोठेही कुलदैवत शोधण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी काही पर्याय आहेत. त्यानुसार आराधना केल्यास कुलदेवाची कृपा निश्चित लाभू शकते. तुम्ही कितीही श्रीमंत, बुद्धिमान, हुशार असाल, सुखसमृद्धीचे मालक असाल पण कुलदेवाला कधीही विसरु नका अथवा कुलदैवत सोडून इतर आराधनाही  करू नका. कुलदेवतेची नित्य नियमित आराधना, पूजाअर्चा, कुलाचार व्यवस्थित चालू असतील तर कोणत्याही संकटातून आपले रक्षण होते किंवा त्यावेळी कोणती आराधना करावी याची सूचना कुलदैवताकडून नकळत मिळत जाते व संकटातून मार्गही सुचत जातो.

कोणत्याही तीर्थक्षेत्री अथवा मंदिरात गेल्यावर कुलदेवाचे स्मरण करण्यास विसरु नका. अन्यथा तीर्थक्षेत्रीय देवतांचा कृपाशीर्वाद मिळत नाही. काही साधू संत अथवा धार्मिक संस्था तर कुलदेवाची आराधना सुद्धा करण्याची गरज नाही, असे तत्वज्ञान शिकवितात. कृष्णाची आराधना करणाºया बहुतेकांना गीतेत भगवान श्रीकृष्णाने काय तत्व सांगितलेले आहे, हेच माहीत नसते. आम्ही कृष्णाच्या नावाने गंध लावतो, त्याची पूजा करतो, त्याच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचतो पण गीतेत काय सांगितले आहे, गीतेचा मतितार्थ काय आहे हे आम्हाला माहित नाही. आम्हाला फक्त कृष्णाची भक्ती करण्यास शिकवितात. पण मोठमोठे साधू, संत गीतेचे महत्त्व काय ते शिकवीत नाहीत, असे अनेकजण प्रांजलपणे कबूल करतात. गीतेतील एकेक अध्याय रोज वाचला तरी त्याच्यावर भगवंताची निस्सीम कृपा होते़ प.पू. श्री गुरूनाथ कंटीकर महाराज,शेळगी, सोलापूर..

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक