वर्धा येथे प्रवाशाच्या सतर्कतेमुळे टळला मोठा रेल्वे अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:47 IST2018-11-12T16:47:02+5:302018-11-12T16:47:28+5:30
वर्धा रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी एका रेल्वे प्रवाशाच्या सतर्कतेमुळे मोठा संभाव्य अपघात टळला.

वर्धा येथे प्रवाशाच्या सतर्कतेमुळे टळला मोठा रेल्वे अपघात
ठळक मुद्देचाकाला गेला होता तडा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: वर्धा रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी एका रेल्वे प्रवाशाच्या सतर्कतेमुळे मोठा संभाव्य अपघात टळला. येथील फलाट क्र. २ वर ११.०६ वाजता आलेल्या ओखापुरी एक्सप्रेसच्या एस -५ या बोगीच्या चाकांच्या वर तडा गेल्याचे एका प्रवाशाच्या लक्षात आले. त्याने तात्काळ ही माहिती टीसी व रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. या माहितीच्या आधारे रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बलाने ही बोगी रिकामी केली. या प्रवाशाच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक केले जात होते. काही वेळानंतर ही गाडी आपल्या पुढील स्थानाकडे रवाना झाली.