ठाण्यात सौरऊर्जेवरील रिक्षेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:42 AM2018-02-06T02:42:11+5:302018-02-06T02:42:16+5:30

ठाणे महापालिकेने सौरऊर्जेवर धावणा-या रिक्षाला प्राधान्य दिले असून महिला बालकल्याण तसेच इतर योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना व्यवसायासाठी यापुढे सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Thackeray launches racket on solar power | ठाण्यात सौरऊर्जेवरील रिक्षेला सुरूवात

ठाण्यात सौरऊर्जेवरील रिक्षेला सुरूवात

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने सौरऊर्जेवर धावणा-या रिक्षाला प्राधान्य दिले असून महिला बालकल्याण तसेच इतर योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना व्यवसायासाठी यापुढे सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पर्यावरणातील घातक वायू कमी करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले. सोमवारी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी या उपक्र माचा शुभारंभ केला.
पर्यावरणसंवर्धनासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने विविध प्रकारचे उपक्र म राबवण्यात येत आहे. सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा हा देखील या उपक्र माचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठीच ही सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर घेतली आहे. संपूर्ण सौरऊर्जेवर चालणाºया या रिक्षामध्ये चार प्रकारच्या बॅटºया आहेत. संपूर्ण आठ तास बॅटरी चार्ज केल्यानंतर ४८ तासांनी ऊर्जा तयार होते. रिक्षा संपूर्ण चार्ज केल्यानंतर कमीतकमी १०० किमीचे अंतर कापता येते. कोणत्याही प्रकारचे इंधन यामध्ये नसल्याने यावर कोणत्या प्रकारचा करदेखील लागणार नाही. केवळ एकदा रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या रिक्षाची किंमत एक लाख ८० हजारांपर्यंत असून महिला बालकल्याणच्या माध्यमातून तसेच इतर योजनांच्या माध्यमातून ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, अशा सर्व नागरिकांसाठी रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
यापूर्वी महापालिकेच्या योजनांमधून नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलच्या रिक्षा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. मात्र, आता पुढचे पाऊल म्हणून पर्यावरणाचे संवर्धन करणे, हा या उपक्र मामागचा मुख्य उद्देश असल्याने व्यवसायासाठी अशा प्रकारच्या रिक्षा घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.
लोकप्रतिनिधींनीदेखील या उपक्र माचे स्वागत केले असून अशा प्रकारचा उपक्र म पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी सांगितले. ठाण्यामध्ये हा उपक्र म यशस्वी करण्यासाठी पालिका प्रशासन तर प्रयत्न करेलच, मात्र हा उपक्र म अधिक यशस्वी करण्यासाठी नागरिकांनादेखील पुढाकार घ्यायला हवा, असे पाटील यांनी सांगितले.
>सौरऊर्जेवर चालणाºया या रिक्षेत चार प्रकारच्या बॅटºया आहेत. ती बॅटरी चार्ज होण्यास किमान आठ तास लागतात. पण एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर रिक्षा कमीतकमी १०० किमीचे अंतर कापते. ही रिक्षा पेट्रोल, डिझेलच्या रिक्षेपेक्षा स्वस्त पडते. एव्हढेच नव्हे, तर सीएनजीच्या रिक्षेपेक्षाही स्वस्त पडते. त्यामुळे साध्या रिक्षेच्या तुलनेत हिचे भाडे खूप कमी आहे. तसेच ती पर्र्यावरणपूरक आहे.

Web Title: Thackeray launches racket on solar power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.