मोदी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखला, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संदीप यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 07:47 PM2019-01-13T19:47:11+5:302019-01-13T19:47:47+5:30

मोदी व  भाजपाने देशातील जनतेला फसवून, दिशाभूल करून सत्ता मिळवली . पण आता जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा ओळखला आहे .

Narendra Modi's true face is known by the public - Sandeep | मोदी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखला, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संदीप यांची टीका

मोदी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखला, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संदीप यांची टीका

Next

मीरारोड - मोदी व  भाजपाने देशातील जनतेला फसवून, दिशाभूल करून सत्ता मिळवली . पण आता जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा ओळखला आहे . देशातील जनता महागाई , भ्रष्टाचार ,  शेतकरी आत्महत्या, मुली - महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी ने पिचली आहे . राफेल विमान घोटाळ्या प्रकरणी मोदी हे राहुल गांधी यांना घाबरून संसदेतून सुद्धा पळत आहेत . जनतेने मोदींना घरी बसवण्या चा निश्चय करून टाकला आहे अशी बोचरी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा कोकण विभाग निरीक्षक बी.एन. संदीप यांनी केली . 

मीरा रोड येथील अस्मिता कॉलेज मध्ये काँग्रेसचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते . यावेळी संदीप बोलत होते . आमदार रामहरी रुपनवार, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, राजेश शर्मा,  मेहुल व्होरा, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह नगरसेवक , पदाधिकारी, कार्यकर्ते आदी शिबिरात सहभागी झाले होते . 

देश स्वतंत्र होण्यापूर्वी चा काळ, ब्रिटिश राजवटीत झालेली आंदोलने.  नेत्यांनी दिलेले बलिदान, देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस शासन काळात झालेली क्रांती, घेतलेले महत्वपुर्ण  निर्णय, झालेला विकास आदींची माहिती राजीव साहू,चैतन्य रेड्डी, विनोद नायर या वक्त्यांनी करून दिली. पक्षाचे नगरसेवक, सर्व सेल चे अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष यांच्या सह १२०० सक्रिय कार्यकर्त्यानी भाग घेतला.  

आलिशान लाखो रुपयांचे कोट घालणाऱ्या मोदींवर राहुल यांनी टीकेची झोड उठवताच मोदी कोट घालायला घाबरतात .  अंबानी व मोदीं बद्दल राहुल बोलतात म्हणून मोदी अंबानींच्या लग्नाला जायला घाबरले .  राफेल वर राहुल बोलतायत म्हणून उत्तर देण्या ऐवजी  मोदी संसदेतून सुद्धा पळ काढत आहेत . मोदी हे राहुल पासून घाबरून पळत असल्याने ते चोर आहेत हे स्पष्ट असल्याचा आरोप संदीप यांनी केला.    

मोदींनी लोकांना खोटी आश्वासने देत फसवणूक करून  सत्ता मिळवली . आणि आम्ही देखील काँग्रेस काळात केलेल्या जनहिताच्या कामांचा प्रचार व प्रसार करायला कमी  पडलो म्हणून हरलो .  आज मोदींच्या राज्यात  अराजकता माजली असून लहान व्यापाऱ्यांना देशोधडीला लावून अंबानी, अदानी सारख्या बड्या उद्योजकांना मोदी हजारो कोटींचा फायदा मोदी करून देत आहेत असे संदीप म्हणाले . 

Web Title: Narendra Modi's true face is known by the public - Sandeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.