द्राक्ष बागायतदारांची संकटावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 03:26 AM2017-11-27T03:26:53+5:302017-11-27T03:26:57+5:30

हक्काचे उत्पादन मिळवून देणा-या फळबागा अवकाळीच्या संकटामुळे शेतक-यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. फळबागांवर खर्च करणे म्हणजे जुगारावर पैसे लावण्याचा अनुभव शेतक-यांना येत आहे.

 Overcome the crisis of grape cultivators | द्राक्ष बागायतदारांची संकटावर मात

द्राक्ष बागायतदारांची संकटावर मात

Next

बारामती : हक्काचे उत्पादन मिळवून देणा-या फळबागा अवकाळीच्या संकटामुळे शेतक-यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. फळबागांवर खर्च करणे म्हणजे जुगारावर पैसे लावण्याचा अनुभव शेतक-यांना येत आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे द्राक्ष, डाळिंब बागांवर आता परिणाम
झाला होता. मात्र योग्य नियोजनामुळे शेतकºयांनी याही संकटावर मात
केली आहे.
बाजारात द्राक्षाचे दर चढे आहेत. त्यामुळे आता अवकाळीचा फेरा नको, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.
उसाचे आगार म्हणून ओळखले गेलेल्या बारामती-इंदापूर तालुक्यांच्या बागायती पट्ट्यात द्राक्ष बागांनी क्षेत्र व्यापले आहे, तर जिरायती भागाला वरदान ठरलेल्या डाळिंबाने येथील शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावला. मात्र द्राक्ष बागांना सातत्याने अवकाळी पावसाचा व खराब हवामानाचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या वर्षीदेखील लांबलेल्या पावासाचा परिणाम द्राक्ष बागांवर झाला होता. त्यातूनही शेतकºयांनी मेहनतीने बागा जपल्या होत्या. मात्र मागील आठवड्यातील अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांची झोप उडवली होती. आगाप बागांमध्ये मणी फुटण्याचे प्रकार घडले तर उशिरा छाटण्या केलेल्या बागांमध्ये डाऊनी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र शेतकºयांनी दिवसरात्र एक करून बागा रोगांपासून वाचवल्या आहेत. अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या एकरी उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र द्राक्षांचे बाजारही तेजीत असल्याने आता अवकाळीचा फेरा नको अशी प्रार्थना शेतकरी करीत आहे.
गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील माल आखाती देशात दरवर्षी निर्यात होत असतो. या भागातील काझड, लासुर्णे, बिरंगुडी, कळस आदी गावांतील शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेत असतो.
नारायणगाव जम्बो, नानासाहेब पर्पल, माणिक चमन, एसएस, आरके, शरद सिडलेस या जातींच्या द्राक्षांना आखाती देशात मोठी मागणी असते. सध्या ‘शरद सिडलेस’ या जातीच्या निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो १०० ते ११० रुपये दर मिळत आहे. तर नारायणगाव जम्बो जातीच्या द्राक्षांना प्रतिकिलो १३० ते १३५ रुपयांपर्यंत निर्यातदार दर देत आहेत.

बाजारात द्राक्षाचे दर
चढे आहेत. त्यामुळे आता अवकाळीचा फेरा नको,
अशी प्रार्थना शेतकरी करीतोय


माझ्या बागेची उशिरा छाटणी केली आहे, अवकाळी पावसामुळे
धास्ती होती. मात्र नियमित फवारण्या व योग्य काळजी घेतल्याने आता बागेमध्ये रोग दिसत नाही. द्राक्षाचा बाजार असाच तेजीत राहिल्यास शेतकºयांच्या मेहनतीचे चिज होणार आहे.
- दादासाहेब सांगळे
द्राक्ष उत्पादक शेतकरी,
बिरंगुडी-कळस

Web Title:  Overcome the crisis of grape cultivators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी