भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकवर मिळवला विजय
By Admin | Updated: February 19, 2017 22:06 IST2017-02-19T22:06:23+5:302017-02-19T22:06:23+5:30
भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकवर मिळवला विजय
ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. 19 - भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतानं 7 गडी राखून पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडमध्ये यंदा जून ते जुलैदरम्यान होणा-या महिलांच्या विश्वचषक सामन्यात खेळण्यासाठी भारतानं जागा निश्चित केली आहे. भारतानं चमकदार खेळीच्या जोरावर लीग आणि सुपर सिक्सच्या सर्व लढती जिंकून क्रमांक 1 पटकावून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारताच्या एकता बिश्त हिनं सर्वोकृष्ट गोलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. तसेच एकतानं 10 षटकांमध्ये 8 धावा देत पाच बळी मिळवले. वन-डेमध्ये 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारी एकता नववी भारतीय गोलंदाज म्हणून नावारुपाला आली आहे.
पाकिस्ताननं 43.3 षटकांत 67 धावा केल्या असून, भारताला विजयासाठी 68 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र भारतानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 22.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा केल्या आहेत. भारताच्या दीप्ती शर्मानं 29 धावांवर नाबाद खेळत राहिली आणि तिला हरमप्रीत कौरनंही 24 धावा करून साथ दिली. वेदा कृष्णमूर्तीनं चौकार लगावत विजय साजरा केला.