चिंताजनक... वर्षभरात काश्मीर खोऱ्यातील १२६ तरुण अतिरेकी मार्गाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 06:53 AM2018-02-07T06:53:04+5:302018-02-07T06:53:54+5:30

गेल्या वर्षात काश्मीर खोऱ्यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २०१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला.

Number of Kashmiris joining terror outfits steadily increasing | चिंताजनक... वर्षभरात काश्मीर खोऱ्यातील १२६ तरुण अतिरेकी मार्गाला

चिंताजनक... वर्षभरात काश्मीर खोऱ्यातील १२६ तरुण अतिरेकी मार्गाला

Next

जम्मू : गेल्या वर्षात काश्मीर खोऱ्यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २०१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला.  ही संख्या २0१६ पेक्षा ८८ ने अधिक होती, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. 

संसदेला सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे स्थानिक तरुणांचे प्रमाण २०१४ नंतर कमालीचे वाढले आहे. सन २०११ ते २०१३ या काळात भरतीचे प्रमाण कमी 

होताना दिसले होते. सन २०११ मध्ये २३ तरुण दहतवादी संघटनांत सहभागी झाले, तर हाच आकडा २०१२ मध्ये २१ आणि २०१३ मध्ये १६ इतका होता.

 मात्र, २०१४ मध्ये हा आकडा ५३ वर पोहोचला. पुढच्या तीन वर्षात हे आकडे अनुक्रमे ६६, ८८ व १२६ असे वाढत गेले. हिजबुल मुजाहिद्दिनचा म्होरक्या बुºहान वणी लष्करी कारवाईत मारला गेल्यानंतर तरुणांचे हत्यार हातात घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. नव्वदच्या दशकात दहशतवादाकडे ओढले जाणारे तरुण वआताचे यात आमुलाग्र फरक आहे, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. सध्या दहशतवादी संघटनांत भरती होणारे तरुण आधीच्या तुलनेत कमालीचे कट्टर आहेत. त्यांना कारवायांमध्ये मारले जाण्याची अजिबात फिकीर नसते. 

तुरुंगात २,६९४ कैदी

मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी असेही सांगितले की, राज्यात विविध तुरुंगांमध्ये २ हजार ६९४ लोक कैदेत आहेत. यात ९६ महिला आहेत. यातील आठ महिलांसह २८८ जणांवर दोष सिद्ध झाला आहे. अन्य २ हजार १५६ जणांवर खटले सुरु आहेत. 

>दगडफेकीत ११,५६६ जवान जखमी

 तीन वर्षांत काश्मीरमध्ये दगडफेकीत ११ हजार ५६६ सुरक्षा जवान जखमी झाले असून, ११० स्थानिक रहिवासी व दोन पोलिसांना जीव गमावले आहेत, अशीही माहिती मेहबुबा मुफ्ती यांनी दिली. या तीन वर्षांमध्ये दगडफेकीच्या ४७३६ घटना घडल्या. त्यात ९ हजार ६७० पोलीस कर्मचारी आणि १ हजार ८९६ सुरक्षा जवान जखमी झाले. 

५१५ घुसखोरांना अटक

नवी दिल्ली : लोकसभेत गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सांगितले की, २०१७ मध्ये जम्मू-काश्मिरात ५१५ घुसखोरांना अटक करण्यात आली आणि ७५ अतिरेकी कारवाईत ठार झाले. सन २०१६ मध्ये सीमेवर घुसखोरी करणाºया ४५ अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात आले.  सीमेवरुन होणारी घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने कडकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे, घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे. 

Web Title: Number of Kashmiris joining terror outfits steadily increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.