मोदींनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्तच केली! मित्र, सहका-यांनी बँंका लुटल्या : राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:55 PM2018-02-17T23:55:45+5:302018-02-17T23:55:55+5:30

पीएनबीचा ११,४०० कोटींचा घोटाळा व त्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीचे देशातून पलायन यावरून थेट तोफ डागताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची वित्तीय व्यवस्था उद््ध्वस्त केल्याचा आरोप शनिवारी केला.

 Modi has destroyed the economy! Rahul Gandhi looted, friends, colleagues | मोदींनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्तच केली! मित्र, सहका-यांनी बँंका लुटल्या : राहुल गांधी

मोदींनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्तच केली! मित्र, सहका-यांनी बँंका लुटल्या : राहुल गांधी

Next

नवी दिल्ली : पीएनबीचा ११,४०० कोटींचा घोटाळा व त्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीचे देशातून पलायन यावरून थेट तोफ डागताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची वित्तीय व्यवस्था उद््ध्वस्त केल्याचा आरोप शनिवारी केला.
काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मोदी यांनी त्यांच्या कृतींनी देशाची वित्तीय व्यवस्था बरबाद केली आहे. त्यांनी लोकांच्या खिशातून पैसे काढून घेऊन ते बँकांमध्ये घातले. आता त्यांचे
मित्र व सहकारी ते पैसे बँकांमधून लुटून नेत आहेत.
सुकाणू समितीची बैठक
राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करून नियुक्त केलेल्या सुकाणू समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत ५ मार्चपूर्वी पक्षाचे अधिवेशन घेण्याबाबत चर्चा झाली. राहुल गांधी यांची पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाली असली तरी त्यावर शिक्कामोर्तब काँग्रेसच्या अधिवेशनात होईल. सुकाणू समितीच्या आजच्या बैठकीस यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, गुलाब नबी आझाद, ए. के. अँथनी, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आदी नेते उपस्थित होते.
पक्षाची नवीन कार्यकारिणी अधिवेशनात निवडली जाईल. राहुल गांधी यांनी सध्याची कार्यकारिणी रद्द करताना ३५ सदस्यांची सुकाणू समिती नेमली. कार्यकारिणीचे सर्व सदस्य सुकाणू समितीचेही सदस्य असले तरी त्यातून अमरिंदर सिंग, विलास मुत्तेमवार, आर. के. धवन, शिवाजीराव देशमुख, मोहसिना किडवाई, एम.व्ही. राजशेखरन या कायम निमंत्रितांना तसेच सर्व विशेष निमंत्रितांना वगळले आहे.
सुकाणू समितीचे इतर सदस्य
बी. के. हरिप्रसाद, डॉ. सी. पी. जोशी, दिग्विजय सिंग, हेमो पूर्वो सैकिया, जनार्दन द्विवेदी, कमल नाथ, मोहन प्रकाश, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, सुशीला तिरिया, अशोक गेहलोत, के. सी. वेणुगोपाळ, अविनाश पांडे, सुशीलकुमार शिंदे, दीपक बाबरिया, पी. सी. चाको, आशा कुमारी, डॉ. ए. चेल्ला कुमार, आर.पी.एन. सिंग, पी. एल. पुनिया, आर. सी. खुंटाई, डॉ. कर्ण
सिंग, पी. चिदम्बरम, आॅस्कर फर्नांडिस, आनंद शर्मा व रणदीप सूरजेवाला.

रोखठोक उत्तरे द्या
या घोटाळयाचे खापर काँग्रेस व संपुआ सरकारच्या माथी मारून भाजपा मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करीत आहे, असे सांगून राहुल गांधी असेही म्हणाले की, अत्यंत वरच्या पातळीवरून संरक्षण असल्याखेरीज एवढा मोठा घोटाळा होऊच शकला नसता. सरकारमधील मंडळींना पूर्वकल्पना असल्याखेरीज हे घडू शकत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी मुख्य विषयाला बगल न देता आम्ही विचारलेल्या प्रश्नांना रोखठोक उत्तरे द्यावीत, असेही ते म्हणाले.

भाजपाचा पलटवार
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा यूपीए सरकारच्या काळातील
असून, त्यांनी केलेली पापे धुवून काढण्याचे काम आम्हाला करावे लागत आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, नीरव मोदी याच्या एका कंपनीशी काँग्रैसचे नेते अभिषेक सिंघवी यांच्या पत्नी अनिता यांचा संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अब्रुनुकसानीचा
दावा करू
निर्मला सीतारामन यांच्या आरोपांचा अभिषेक सिंघवी यांनी लगेच स्पष्ट शब्दांत इन्कार केला. माझी पत्नी वा कुटुंबातील कोणाचाही गीतांजली ज्वेलर्सची काडीमात्र संबंध नाही, असे सांगतानाच सिंघवी यांनी खोट्या माहितीबद्दल आपण निर्मला सीताराम यांच्यावर अब्रनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशाराही दिला.

Web Title:  Modi has destroyed the economy! Rahul Gandhi looted, friends, colleagues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.