जनतेमध्ये आक्रोश, भाजपाचा पराभव होणार हे निश्चित, मतदानानंतर प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:45 PM2019-05-12T12:45:09+5:302019-05-12T12:45:43+5:30

सध्या सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा पराभव होणे निश्चित आहे

It's a really important election because we are fighting to save democracy & country - Priyanka Gandhi | जनतेमध्ये आक्रोश, भाजपाचा पराभव होणार हे निश्चित, मतदानानंतर प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया

जनतेमध्ये आक्रोश, भाजपाचा पराभव होणार हे निश्चित, मतदानानंतर प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया

Next

नवी दिल्ली - सध्या सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा पराभव होणे निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी दिली.  

प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील लोढी इस्टेट येथील सरदार पटेल विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ''यंदाची लोकसभेची निवडणूक लोकशाही आणि देशाला वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मतदान करताना ही बाब लक्षात ठेवा.  या निवडणुकीदम्यान देशातील जतेमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आक्रोश दिसत होता. त्यामुळे भाजपाचा पराभव होणार हे स्पष्ट आहे.'' असे प्रियंका गांधी म्हणाल्या.





पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिलेल्या आश्वासनांबाबत काहीच बोलत नाही. दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन, प्रत्येकाला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन याबाबत बोलण्याऐवजी नरेंद्र मोदी हे वायफळ विषयांवर बोलत आहेत. असा टोलाही प्रियंका गांधी यांनी यावेळी लगावला. 



 

Web Title: It's a really important election because we are fighting to save democracy & country - Priyanka Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.