मोदी सरकार सत्तेत न आल्यास भारत 50 वर्षे मागे जाईल - निर्मला सितारमण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 10:43 AM2019-02-25T10:43:29+5:302019-02-25T10:44:26+5:30

भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचे योग्य मूल्यमापन करण्यास मतदार चुकले तर ही देशाची मोठी हानी ठरेल.

India will go back 50 years if Modi government does not come to power - Nirmala Sitaraman | मोदी सरकार सत्तेत न आल्यास भारत 50 वर्षे मागे जाईल - निर्मला सितारमण

मोदी सरकार सत्तेत न आल्यास भारत 50 वर्षे मागे जाईल - निर्मला सितारमण

Next

बंगळुरू - आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळणे गरजेचे आहे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकर न आल्यास भारत देश 50 वर्षे पाठीमागे जाईल, असे  संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटले. बंगळुरू येथील थिंकर फोरमच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचे योग्य मूल्यमापन करण्यास मतदार चुकले तर ही देशाची मोठी हानी ठरेल. गेल्या 5 वर्षात मोदी सरकारने जे काम केले ते अतुलनीय आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची तुलना सर्वश्रेष्ठ अशीच करता येईल. देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात अशी लिडरशीप आजपर्यंत देशवासियांना भेटली नाही. गेल्या 5 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही सुट्टी न घेता काम केलंय, असेही सितारमण यांनी म्हटले. तसेच काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आणि आताच्या भाजपाप्रणित आघाडी सरकारमध्ये मोठा फरक असून गेल्या 5 वर्षात भ्रष्टाचारचा एकही दाग मोदी सरकारवर लागला नसल्याचेही सितारमण यांनी म्हटले. 


Web Title: India will go back 50 years if Modi government does not come to power - Nirmala Sitaraman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.