बाणगंगा काठच्या गावांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 04:52 PM2019-06-05T16:52:35+5:302019-06-05T16:53:03+5:30

गंगापूर धरणातून आवर्तन : शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर

Relief to Baanganga Katha villages | बाणगंगा काठच्या गावांना दिलासा

बाणगंगा काठच्या गावांना दिलासा

Next
ठळक मुद्दे बाणगंगेवरील सर्व बंधारे भरली जाणार असल्याने बाणगंगा काठाच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बाणगंगा काठच्या सात गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाई वर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाने गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पिण्याचा पाण्यासाठी आवर्तन सोडले आहे. जनतेची मागणी लक्षात घेऊन बाणगंगेला पाणी सोडल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे तर शेतीसाठी आवर्तन न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.
बाणगंगा काठावरील दिक्षी ,दात्याणे, जिव्हाळे, ओणे, थेरगाव, कसबे सुकेणे व मौजे सुकेणे या सर्व गावांचा पाणीपुरवठा हा बाणगंगेच्या काठावर असलेल्या विहीरींवर आधारित आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाणगंगा कोरडी ठाक पडल्याने बाणगंगा काठच्या सात गावांतील शेती ,जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. द्राक्षबागा ,फुलशेती कोमजली असून जनावरांचेही पाण्यासाठी हाल होत आहे. पाण्यासाठी नागरीक दररोज भटकंती करीत आहे. टंचाईची गंभीर परिस्थितीची पाहणी करून आमदार अनिल कदम यांनी कसबे सुकेणे येथे गेल्या आठवड्यात तातडीची बैठक घेतली होती. त्यानंतर प्रशासनाकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार रविवार (दि.२)पासून गंगापूर धरणातून डाव्या कालव्यातून बाणगंगेला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. सोमवारी दुपारपर्यंत पाणी दात्याने बंधा-यापर्यंत पोहचले होते. बाणगंगेवरील सर्व बंधारे भरली जाणार असल्याने बाणगंगा काठाच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.

Web Title: Relief to Baanganga Katha villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.