शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे दिवसभर अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:33 AM2018-03-20T01:33:49+5:302018-03-20T01:33:49+5:30

१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्णातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव कर्पे यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून केलेल्या कुटुंबासह सामूहिक आत्महत्येच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवारी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिवसभर अन्नत्याग आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर केले.

 Day of the movement of the Steering Committee of the Farmers' Organization | शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे दिवसभर अन्नत्याग आंदोलन

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे दिवसभर अन्नत्याग आंदोलन

googlenewsNext

नाशिक : १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्णातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव कर्पे यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून केलेल्या कुटुंबासह सामूहिक आत्महत्येच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोमवारी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिवसभर अन्नत्याग आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर केले.  शेतकरी सुकाणू समितीने राज्यभर केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून सकाळी दहा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली.  धुळे जिल्ह्णातील विखरण येथील धर्मा पाटील यांनीदेखील अलीकडेच आत्महत्या केली असून, शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असताना सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यां विषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी व शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, बंद उपसा जलसिंचन संस्थांचे कर्ज माफ करावे, पॉलिहाउस, शेडनेट, शेतीपूरक सर्व कर्ज माफ करावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.  अन्नत्याग आंदोलनाच्या समारोपात जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्णातील शेतकºयांनी १९९५ ते २००० या काळात सहकारी उपसा जलसिंचन संस्था स्थापन केल्या. त्यासाठी जिल्हा बॅँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात आला, परंतु या योजनेत शेतकºयांना थेंबभर पाणीही शेतीला मिळाले नाही. उलट शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेने बोजा चढविला आहे. त्यामुळे शेतकºयांना अन्य बॅँकांकडून कर्ज घेणेही मुश्कील झाले आहे. जळगाव जिल्ह्णातील बंद उपसा जलसिंचन संस्था पुन्हा उभारण्यासाठी राज्य सरकारने २५ कोटींचे अनुदान दिले त्याच धर्तीवर जिल्ह्णातील संस्थांचे कर्ज मुक्त करावे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, वृद्धापकाळात शेतकºयांना पेन्शन द्या, चांदवड, निफाड येथील द्राक्ष उत्पादकांना बुडविणाºया व्यापाºयांचा शोध घ्यावा आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात राजू देसले, करण गायकर, गणेश कदम, भास्कर शिंदे, धर्मराज शिंदे, नंदकुमार कर्डक, संपत थेटे, नामदेव बाराडे, सुभाष शेळके, एकनाथ दौंड, भीमा उगले, भास्कर उगले, संजय बैरागी,  पंकज विधाते, आदी सहभागी झाले होते.

Web Title:  Day of the movement of the Steering Committee of the Farmers' Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.