पाऊस परतल्याने नंदुरबारातील पिकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:14 PM2018-08-26T13:14:00+5:302018-08-26T13:14:07+5:30

Returning to the rain, Nandurbar Paksha is the lifeline | पाऊस परतल्याने नंदुरबारातील पिकांना जीवनदान

पाऊस परतल्याने नंदुरबारातील पिकांना जीवनदान

Next

नंदुरबार : नंदुरबारात श्रावणाच्या सुरुवातीपासून आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील साधारणत दीड लाख हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळाला आह़े त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधान दिसून येत आह़े पावसानंतर काही प्रमाणात उनदेखील पडत असल्याने हे वातावरण पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े
नंदुरबारात साधारणत जुन व जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडलेला होता़ पावसाने दडी मारली असल्याने एकूण खरिप हंगामातील 2 लाख 41 हजार 761 हेक्टरापैकी साधारणत दीड लाख हेक्टरावरील पिकं धोक्यात आलेली होती़ त्यात कापूस पिकाची स्थिती अधिकच चिंताजनक होती़ जिल्ह्यात  एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची पेरणी करण्यात आलेली आह़े जिल्ह्यात आतार्पयत साधारणत 92 टक्के खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत़
जिल्ह्यात सरासरी पावसाच्या निम्मे पाऊस झालेला असला तरी सध्या येत असलेल्या पावसामुळे पिके तरारली आहेत़ श्रावण महिन्यात झालेल्या पावसामुळे कापसावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येत आह़े 
तीन दिवसांपासून पावसाची हजेरी
गेल्या आठवडय़ापासून पावसाने सलग हजेरी लावलेली आह़े नंदुरबार शहरासह, तळोदा अक्कलकुवा, नवापूर आदी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली दिसून येत आह़े ग्रामीण भागात पावसाची संततधार दिसून येत आह़े नंदुरबारात सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती़ दुपार्पयत दमदार पाऊस झाल्यानंतर काहीसे उन्ह पडलेले दिसून आल़े  तळोद्यातील ग्रामीण भागात दिवसभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता़ त्यामुळे शेतक:यांना काही काळ शेती कामे थांबवावी लागली होती़
केळी, पपई पिकांना दिलासा
शहादा, तळोदा तालुक्यासह  नंदुरबार तालुक्यातील परिसरात केळी व पपई पिक घेण्यात येत असत़े जुन व जुलै महिन्यात पाउसपाणी नसल्याने ही पिकही धोक्यात आलेली होती़ हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून केळी तसेच पपईकडे पाहिले जात असत़े परंतु पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारली असल्याने शेतकरी संकटात सापडलेले होत़े 
ऑगस्ट महिन्यात पाऊस  परतल्याने ही पिक आता धोक्याबाहेर असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े 
1 लाख हेक्टरवर कापूस लागवड
जिल्ह्यातील एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची लागवड करण्यात आलेली आह़े  तालुकानिहाय पाहिले असता, नंदुरबार 39 हजार 480 हेक्टर, नवापूर 5 हजार 121 हेक्टर, शहादा 47 हजार 488, तळोदा 8 हजार 420 हेक्टर, अक्राणी 480 हेक्टर, अक्कलकुवा 3 हजार 660 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आह़े 
यंदाच्या पावसाळ्यात तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, रोझवा पूनर्वसन आदी परिसरात पिकपाणी बरे असले तरी, नंदुरबार तालुका, शहाद्यातील काही भाग वगळता इतर बहुतांश ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आह़े अशीच परिस्थिती अक्कलकुवा, धडगाव आदी परिसराचीसुध्दा          आह़े शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गणित हे खरिप हंगामावरच अवलंबून असत़े गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरडय़ा दिवसांची संख्या वाढली असल्याने साहजिकच याचा परिणाम उत्पन्नावर जाणवनार आह़े 
जलस्त्रोतांमध्ये वाढ होणे गरजेचे
यंदाच्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याचा पारा 44 अंश सेल्शिअसर्पयत गेला होता़ वर्षागणिक उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आह़े त्यामुळे साहजिकच जिल्ह्याच्या पाणी पातळीत मोठी घट झालेली आह़े त्याताच पावसाळ्यात जुन व जुलै महिना संपूर्ण कोरडा गेल्याने पाण्याची समस्या निर्माण झालेली आह़े जिल्ह्यात आतार्पयत सरासरी 54 टक्के इतका पाऊस झालेला आह़े त्यामुळे यातून लघु व मध्यप्रकल्पांमध्ये काही अंशीच वाढ झालेली दिसून येत आह़े सप्टेंबरच्या शेवटापासून परतीच्या पावसाला सुरुवात होत असत़े त्याला अजून साधारणत 1 महिन्याचा अवकाश आह़े त्यामुळे या दरम्यान, दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े परतीच्या पावसाचा कालखंड वाढत असल्याने त्या दरम्यानही चांगला पाऊस होणे अपेक्षीत आह़े
 

Web Title: Returning to the rain, Nandurbar Paksha is the lifeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.