राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 01:15 PM2018-10-23T13:15:26+5:302018-10-23T13:26:48+5:30

तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना सुरू करण्यात येणार

state government declares drought in 180 talukas | राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

Next

मुंबई: राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता यानुसार 180 तालुक्यांमध्ये उपाययोजना केल्या जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची घोषणा केली.




राज्यात सरासरीच्या 77 टक्के पाऊस पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. दुष्काळसदृश्य भागाच्या पाहणीसाठी लवकरच केंद्राची टीम राज्यात येईल आणि त्यानंतर मदतीची घोषणा होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये उपाययोजनांना सुरुवात होईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

कोणत्या उपाययोजना राबवल्या जाणार-
- जमीन महसुलात सूट
- शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
- टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित होणार नाही
- पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकर योजना
- कृषी पंपाच्या बिलात सूट
- शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट
- रोहयोच्या अंतर्गत कामाच्या निकषात सूट

Web Title: state government declares drought in 180 talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.