केंद्राने दिले आता राज्यानेही द्यावे, तरच साखर उद्योग सुधारेल : दांडेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:32 PM2018-09-26T23:32:03+5:302018-09-26T23:32:15+5:30

The Center will improve the sugar industry only if given by the Center: Dandgaonkar | केंद्राने दिले आता राज्यानेही द्यावे, तरच साखर उद्योग सुधारेल : दांडेगावकर

केंद्राने दिले आता राज्यानेही द्यावे, तरच साखर उद्योग सुधारेल : दांडेगावकर

Next

चंद्रकांत कित्तुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी साखर उद्योगाला साडेपाच हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला असला तरी महाराष्टÑातील कारखान्याच्या अडचणी सुटणार नाहीत .त्यामुळे राज्य सरकारनेही मदतीचा हात देणे गरजेचे असल्याचे मत राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
केंद्राच्या आजच्या पॅकेजनंतर आंतरराष्टÑीय बाजारातील कच्च्या साखरेचे दर २ ते अडीच टक्कयांनी उतरले आहेत ती प्रतिकिलो १७ रुपयांवरुन साडेचौदा रुपयांवर आली आहे. येत्या दोन दिवसात हे दर कसे राहतात हे पहावे लागेल. ऊस उत्पादकांचे अनुदान आणि वाहतूक अनुदान विचारात घेता कारखान्यांना कच्ची साखर निर्यात केल्यास सरासरी २५५० रुपये दर मिळेल. महाराष्टÑातील कारखान्यांचा साखरेचा उत्पादन खर्च ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल आहे. तो यातून भरुन निघत नाही. यामुळे काखान्यांसमोरील अडचणी कायम राहणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारनेही तेथील ऊस उत्पादकांनापॅकेज देवू केले आहे. त्या धर्तीवर महाराष्टÑ सरकारनेही पॅकेज दिल्यास ऊसाला एफआरपीपेक्षा जादा दर देता येईल, असेही दांडेगावरकर यांनी सांगितले.

Web Title: The Center will improve the sugar industry only if given by the Center: Dandgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.