पालकांची तक्रार असते- मुलगा मोबाइल सोडतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:07 PM2018-05-18T16:07:32+5:302018-05-18T16:07:32+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सुजाण पालकत्व’ या सदरात मानसोचार तज्ज्ञ डॉ.नीरज देव यांचा लेख ‘मुलगा मोबाइलच सोडत नाही’

 Parents complain - the boy does not leave the mobile | पालकांची तक्रार असते- मुलगा मोबाइल सोडतच नाही

पालकांची तक्रार असते- मुलगा मोबाइल सोडतच नाही

Next

हा प्रश्न सोडविण्यासाठी या समस्येला नीट समजावून घेणे गरजेचे आहे. आज मोबाइल बहुउपयोगी उपकरण म्हणून वापरल्या जातोय ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. तो केवळ दूरभाष म्हणून वापरला जात नाही तर कॅमेरा, व्हीडिओ, अल्बम, कॅल्युलेटर, कॉम्प्युटर, टीव्ही, रेडीओ, टेपरेकॉर्डर, सीडी-डिव्हीडी प्लेयर, इंटरनेट संपर्क अगदी पुस्तक म्हणूनसुद्धा आदी अनेकानेक कामांसाठी सहजतेने वापरता येणारे, सहज उपलब्ध होणारे व परवडणारे साधन म्हणून वापरला जात आहे. जेव्हा एखादे साधन इतके आकर्षक व बहुउपयोगी बनते तेव्हा त्याचे व्यसन जडणे तसे स्वाभाविकच ठरते. विशेषत: समज येण्यापूर्वीच्या वयात तो हाती लागला तर मग विचारणेच नको. आज काल तर हातात खुळखुळा धरण्याआधी मोबाइल धरला जातो व तो खुळखुळ्याचेही काम करत असल्याने हातातून सुटतच नाही. या समस्येची व्यापकता ध्यानात घेऊन पालकांनी खालील बाबी पाळायला हव्यात।
०१। अगदी बालवयात, शिशूवयात मुला वा मुलीने शांत बसावे, त्रास देऊ नये म्हणून पालक त्यांना मोबाइल देताना दिसतात. ते बाळाच्या शारीरिक विकासासोबतच मानसिक व कधी कधी मेंदूजन्य विकासाला घातक ठरते. हे कटाक्षाने टाळावे.
०२। शक्यतोवर मोबाइलचा वापर केवळ फोन म्हणूनच करायला हवा. जर ते शक्य नसेल तर घरात संपकार्साठी लॅण्डलाईन फोन शक्यतो वापरावा. मोबाईल बंद ठेवावा. फोटो, व्हीडिओ इत्यादी बाबींसाठी शक्यतोवर कॅमेरा इत्यादीसारखी साधनेच वापरावीत. क्रिकेट मॅच, धारावाहिक, बातम्या इत्यादी पाहण्यासाठी मोबाइलचा वापर टाळावा. शक्यतोवर टीव्ही वा एलसीडीचा वापर करावा. थोडक्यात होता होईल तितका मोबाइलचा वापर कमी करावा.
०३। घरात असताना मुलांसोबत प्रत्यक्ष संवादाला अधिक वेळ द्यावा. त्यातही मुलांचे म्हणणे ऐकून घेणे, त्याच्यातील उपजत कलागुणांना वाव देणे, कौतुक करणे इत्यादी बाबी केल्या तर मुलांचे लक्ष मोबाइलवरून कमी करणे शक्य होऊ शकते.
०४। मुलांनी उन्हातान्हात क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळ खेळून आजारी पडण्यापेक्षा मोबाइलवर त्यांनी ते खेळ खेळावेत, असा चुकीचा सल्ला काही पालक देत असतात. असा सल्ला टाळून मुलांना मैदानी खेळ खेळायला पालकांनी प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे मुलांचा मुलांशी संपर्क वाढतो, त्यांच्या सामाजिक समायोजनाला मदत होते. मैदानी खेळाकडे लक्ष वाढल्याने मोबाइलकडे लक्ष जाण्याची शक्यता कमी व्हायला मदत होते.
०५। त्याचप्रमाणे बुद्धिबळ, कॅरम इत्यादी बैठे खेळ प्रत्यक्ष खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. वाटल्यास आरंभी आपण त्यांच्यासोबत खेळून नंतर इतर मुलांसोबत खेळायला उत्तेजन द्यावे. या प्रकारच्या खेळांमुळे बुद्धीच्या विकासासोबत संयम, वाट पहाण्याची तयारी, एकाग्रता आदी बाबींचा विकास मुलांत होतो. प्रत्यक्ष खेळण्याकडे चित्त लागल्याने, त्यातील जयापजयाचे थ्रिल अनुभवल्याने मोबाइलवर लक्ष जाण्याची शक्यता कमी होते.
या व अशा काही बाबींचा कौशल्याने केलेला वापर मुलांना मोबाइलपासून परावृत्त करायला उपयोगी ठरु शकतो. मोबाइल, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक आणि मुलं असे समीकरणच झाले आहे. या समीकरणात आई-वडील आले की व्यस्त समीकरणाला सुरवात होते. अर्थात आई-वडीलच कशाला, नवरा-बायकोचे नातेही याच व्यस्ततेत बसते. मोबाइलचा अति वापर मुलं करतात, ही प्रत्येक पालकासाठी मोठी समस्या बनलेली आहे. यातून सुटका कशी करावी हा त्याहीपेक्षा गहन प्रश्न बनला आहे. यातून काही प्रकारच्या मानसिक समस्या वा मनोविकृती निर्माण होण्याची शक्यता असते. या समस्यांचा विचार करण्यासाठी सायबर सायकॉलॉजीची निर्मिती अलिकडेच करण्यात आलेली आहे.

Web Title:  Parents complain - the boy does not leave the mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.