‘हमी’ पेक्षाही कमी दरात कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:15 AM2019-02-25T11:15:02+5:302019-02-25T11:15:08+5:30

खासगीसह, शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

Buy cotton at a lower rate than 'Guarantee' | ‘हमी’ पेक्षाही कमी दरात कापूस खरेदी

‘हमी’ पेक्षाही कमी दरात कापूस खरेदी

Next
ठळक मुद्दे भावात सातत्याने घट



अजय पाटील ।
जळगाव : भाव वाढेल या अपेक्षेने शेतकºयांनी चार महिने वाट पाहिल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून शेतकºयांकडून कापूस विक्रीसाठी काढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, शेतकºयांकडून माल विक्रीसाठी आणल्यानंतर शासकीय व खासगी जिनींगवर शेतकºयांकडून नियम व अटीं दाखवून हमीभावापेक्षाही कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच फरदड नसतानाही फरदड असल्याचे सांगत शेतकºयांचा मालामध्ये दोष शोधले जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
यावर्षी जरी पाऊस चांगला झाला नसला तरी कापसाची गुणवत्ता गेल्यावर्षापेक्षाही चांगली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील कमी असल्याने कापसाचा दर्जा चांगला असल्याने यंदा कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकºयांची होती. तसेच शासनाकडून ५४५० प्रतीक्विंटल इतका हमीभाव निश्चित करण्यात आल्यानंतर खासगी बाजारात कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकºयांची होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात ६ हजार प्रतीक्विंटलचा दर मिळाल्यानंतर दिवाळीनंतर कापसाच्या दरात सारखी घट झालेली पहायला मिळाली. त्यात मकरसंक्रांतीनंतर देखील कापसाला उठाव आला नसल्याने शेतकºयांची निराशाच झाली आहे.
वाट पाहिल्यानंतर शेतकºयांकडून कापूस विक्री
चार महिने भाव वाढीची अपेक्षा फोल झाल्यानंतर आता शेतकºयांकडून बाजारात कापूस आणला जात असताना,आता सीसीआय व व्यापाºयांकडून आता मनमानी पध्दतीने भाव निश्चित केले जात आहेत. यंदा कापसाची गुणवत्ता चांगली असतानाही व्यापारी व सीसीआयच्या केंद्रावर कापसाचा उतारा कमी दाखवला जात आहे. त्यामुळे शेतकºयांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
फरदड नसतानाही परत केला जातोय कापूस
यंदा शेतकºयांनी आपल्याकडील कापूस जानेवारी महिन्यापर्यंत विक्रीसाठी आणलाच नव्हता. आता शेतकºयांकडून विक्रीसाठी आणला जाणारा कापूस हा सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यानचा आहे. मात्र, कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांचा हाच माल फरदड असल्याचे सांगत परत केला जात आहे. किंवा कमी दराने खरेदी केला जात आहे. हमीभाव ५४५० इतका निश्चित केला असताना शासकीय खरेदी केंद्रावर ५ हजार ते ५३०० रुपयांप्रमाणे कापूस खरेदी केली जात आहे.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
कापसासाठी हमीभाव निश्चित केला असतानाही हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याने शेतकºयांकडून सीसीआयच्या केंद्रप्रमुखांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. जिल्ह्यात सीसीआयचे आव्हाणे, वºहाड व जामनेर या तीनच ठिकाणी कें द्र सुरु आहेत. खरेदी केंद्रावरच हमीभावापेक्षा कमी दराने कापूस केला जात असल्याने खासगी व्यापारी देखील सीसीआयच्या भावापेक्षा केवळ १०० ते २०० रुपयांची वाढ देवून माल खरेदी करत आहेत.
संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या
जळगाव - पूर्णवेळ संशोधन करणाºया विद्यार्थ्यांसाठी मासिक नऊ हजार रूपये फेलोशिप सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
निवेदन देऊन केले़ यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ा्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, जिल्हा प्रमुख प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी, नगरमंत्री योगेश पाटील, महेश कचरे, अतुल तेली, हर्षल तांबट, श्रुती शर्मा व भावना शंकोपाळ उपस्थित होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाव वाढीची अपेक्षा
लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कापसाचे भाव वाढतील अशी एकमेव आशा शेतकºयांना लागली आहे. तसेच मार्च एण्डमध्ये देखील कापसाचे भाव वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कापूस बाजारातील जाणकारांच्या मते कापसाचे भाव जरी वाढले तरी ते भावात मोठा फरक राहणार नाही.

Web Title: Buy cotton at a lower rate than 'Guarantee'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.