जंगलातील पाणवठे पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 09:11 PM2019-05-09T21:11:20+5:302019-05-09T21:11:50+5:30

यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे.

The waters of the forest fell dry | जंगलातील पाणवठे पडले कोरडे

जंगलातील पाणवठे पडले कोरडे

Next
ठळक मुद्देवन्यप्राण्याचा उष्माघाताने मृत्यू : वन्यजीव विभागाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे. तर वाढते तापमान आणि पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू होत आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण पहाडी परिसरात नुकताच असा प्रकार उघडकीस आला.
तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहे. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यंदा एप्रिल महिन्यातच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीे टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात घट होत आहे.त्यामुळेच जंगलातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी गावाकडे धाव घेण्याची वेळ आली असून पाण्याअभावी व उष्णतेच्या दाहकतेमुळे रानगव्यासारख्या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. यामुळे वन आणि वन्यजीव विभागाच्या उपाय योजनांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २५६ पाणवठे असून त्यापैकी ७८ नैसिर्गक स्त्रोताचे तर १५४ कृत्रिम पाणवठे आहेत. २४ तलाव ही या क्षेत्रात आहे. १५४ कृत्रीम पाणवठ्यात पाणी पुरवठा व्हावा यासाठी १४१ हातपंप तयार केलेले आहेत. त्यापैकी ११० हातपंप सौरऊर्जेवर चालणारे आहेत.१३ पाणवठ्यात तीन टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय केली जात आहे. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत नसल्याचे वन्यजीव विभागाचे म्हणने आहे. तर वन्यप्रेमीनी आठ दिवसांपूर्वी जंगलातील कुठल्याच पाण्याची सोय करण्यात नसल्याचा आरोप केला आहे.
काही निसर्ग प्रेमी संस्थानी यावर आवाज उठविल्यानंतर वन्यजीव विभागाने टँकर लावून पाण्याची सोय केल्याची माहिती आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 

Web Title: The waters of the forest fell dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.