पहिल्या अपत्याच्या वेळी मिळणार ५ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:07 AM2017-11-22T00:07:24+5:302017-11-22T00:07:40+5:30

बाल आणि माता मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जननी शिशू सुरक्षा योजनेपासून माहेर घर, हिरकणी कक्षापर्यंतच्या सोयी गर्भवतींसाठी केल्या जात आहे.

 At the time of first marriage, 5 thousand | पहिल्या अपत्याच्या वेळी मिळणार ५ हजार

पहिल्या अपत्याच्या वेळी मिळणार ५ हजार

googlenewsNext
ठळक मुद्देलाभासाठी कोणतीही अट नाही : ६ हजार ३१३ महिलांचे होणार मातृवंदन

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाल आणि माता मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जननी शिशू सुरक्षा योजनेपासून माहेर घर, हिरकणी कक्षापर्यंतच्या सोयी गर्भवतींसाठी केल्या जात आहे. मात्र यानंतरही मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता गर्भवतींना पहिल्या अपत्यासाठी शासनाने मातृ वंदन योजनेतंर्गत ५ हजार रूपयांचे अनुदान देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी. त्यांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तीन टप्यात ५ हजार रूपये केंद्र शासनाने देण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकार मार्फत गरोदर महिला/स्तनदा मातेस ५ हजार रूपये पंतप्रधान मातृ वंदन योजनेतून दिले जात आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीे हा अनुसूचित जाती, जमातील व द्रारिद्रय रेषेखालील असावा अशी कोणतीही अट नाही. पहिल्या अपत्यासाठी नोकरदार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. मात्र अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा सेविका यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या व्यतिरीक्त जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यासाठी पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या बँक, पोस्ट खात्यावर (डीबीटी) ही रक्कम जमा होणार आहे. लाभार्थीचे खाते क्रमांक व आधार क्रमांक आवश्यक आहे. १ जानेवारी २०१७ पासून गरोदर महिलांना लाभ देण्यात येणार आहे. (म्हणजे लसीकरण कार्ड वरील एलएमपी १ जानेवारी २०१७ किंवा पुढची असावी) सदर लाभ घेण्यासाठी लसीकरण कार्ड (एलएमपी) महत्वाचे आहे.
असा मिळणार लाभ
गर्भवतीच्या नोंदणीच्यावेळी १००० रूपये देण्यात येईल. गर्भवती होण्याच्या १५० दिवसात नोंदणी करणे आवश्यक आहे. गरोदरपणाला सहा महिने पूर्ण होताच २००० रूपये देण्यात येतील. त्यासाठी किमान एक तपासणी करणे आवश्यक आहे. प्रसूतीपश्चात बालकाची जन्मनोंद व पेंटाव्हॅलन्ट ३ रा डोज दिल्यानंतर (१४ आठवडे) लसीकरण पूर्ण झाल्यावर तिसºया टप्यातील २००० रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.
६३१३ महिला पात्र
१ जानेवारी २०१७ पासून गर्भवती झालेल्या महिलांपैकी जी महिला पहिल्यांदाच गर्भवती झाली त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात एप्रिल ते आॅक्टोबर या दरम्यान गोंदिया जिल्ह्यात १२ हजार १६ महिला गर्भवती असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. यातील ६ हजार ३१३ महिला पहिल्यांदाच गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

शासनाने यासंदर्भात आढावा घेतला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. लवकरच कार्यवाही करून या योजनेचा लाभ शासनाच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
डॉ. श्याम निमगडे
जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गोंदिया.

Web Title:  At the time of first marriage, 5 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.