भाजप शासनाकडून जनतेची फसवणूक : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2017 11:53 PM2017-03-27T23:53:39+5:302017-03-27T23:59:41+5:30

लातूर :सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे सोमवारी केले.

BJP government cheated of people: Dhananjay Munde | भाजप शासनाकडून जनतेची फसवणूक : धनंजय मुंडे

भाजप शासनाकडून जनतेची फसवणूक : धनंजय मुंडे

googlenewsNext

लातूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, अशी घोषणा देऊन केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांसह जनतेची फसवणूक केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे तर राज्याचा आणि देशाचा विकास दर खुंटला आहे. त्यामुळे या सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे सोमवारी केले.
लातूर मनपा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सभेद्वारे झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, अशोक गोविंदपूरकर, पप्पू कुलकर्णी, संजय शेटे, राजा मणियार, मुर्तुजा खान आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुंडे म्हणाले, महागाईचा डोंगर उभा करून भाजपाने निवडणुका जिंकल्या. मात्र गेल्या तीन वर्षांत हा महागाईचा डोंगर कमी करता आला नाही. सरकारने सर्वसामान्य जनतेसह शेतमजूर आणि शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे.

Web Title: BJP government cheated of people: Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.