कर्जमाफीसाठी १६ लाख शेतक-यांची नोंदणी,  ८ लाख शेतक-यांनी भरले आॅनलाईन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 08:19 PM2017-09-14T20:19:47+5:302017-09-14T20:29:24+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटचे २४ तास शिल्लक आहेत. अमरावती विभागात बुधवारपर्यंत १५ लाख ६० हजार शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे.

Registration of 16 lakh farmers for loan waiver, online application filled by 8 lakh farmers | कर्जमाफीसाठी १६ लाख शेतक-यांची नोंदणी,  ८ लाख शेतक-यांनी भरले आॅनलाईन अर्ज

कर्जमाफीसाठी १६ लाख शेतक-यांची नोंदणी,  ८ लाख शेतक-यांनी भरले आॅनलाईन अर्ज

Next

अमरावती, दि. 14 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटचे २४ तास शिल्लक आहेत. अमरावती विभागात बुधवारपर्यंत १५ लाख ६० हजार शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे, तर ७ लाख ८२ हजार शेतक-यांनी अर्ज भरले आहेत. या आठवड्यात आपले सरकार पोर्टलसाठी सर्व्हरचा वेग वाढल्याने अर्जांची संख्यावाढ झाली आहे. अद्याप तीन लाख शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी असल्याने योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.
योजनेची १५ सप्टेंबर ही 'डेडलाईन' आहे. मात्र, या अवधीत सर्व पात्र शेतक-यांचे अर्ज भरणे शक्य नाही. तसेच ग्रामीण भागात व मेळघाटात इटंरनेटची समस्या असल्याने योजनेला किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यंत किंवा नंतरच्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यंत वसूल न झालेले थकीत व उर्वरित हप्ते यांचा समावेश आहे.
सुरूवातीपासूनच योजनेचे सर्व्हर डाऊन, नेट कनेक्टिव्हिटी नाही, बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट न होने, शेतक-यांना केंद्रचालकांचे असहकार्य. आॅनलाईन अर्जासाठी शेतक-यांकडून पैसे उकळणे आदी समस्यांमध्ये कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया रखडली होती. आता जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असला तरी एक दिवसच मुदत शिल्लक असल्याने योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे

बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २.१६ लाख अर्ज
अमरावती विभागात १५ लाख ६० हजार शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली, तर ७ लाख ८२ हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक ४,२२,०६४ शेतक-यांची नोंदणी बुलडाणा जिल्ह्यात झाली. २,१६,३२६ अर्ज भरले आहेत. अकोला जिल्ह्यात २,२१,३४३ नोंदणी व १,१२,८८१ अर्ज भरले आहेत. अमरावती जिल्ह्यात २,२९,२०९, शेतक-यांची नोंदणी व १,४२,६८५ अर्ज भरले आहे. वाशिम जिल्ह्यात २,१८,८९७ शेतक-यांची नोंदणी व १,०६,५६९ अर्ज भरले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४,०५,०३८ शेतक-यांची नोंदणी व २,०३,२६० शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

Web Title: Registration of 16 lakh farmers for loan waiver, online application filled by 8 lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी