शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेची फी जिल्हा परिषद भरणार; परिषदेची विनंती मान्य, राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे ‘टार्गेट’

By अविनाश साबापुरे | Updated: August 10, 2023 20:30 IST

२०१७ पर्यंत दरवर्षी राज्यातील तब्बल १५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देत होते.

यवतमाळ : २०१७ पर्यंत दरवर्षी राज्यातील तब्बल १५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देत होते. मात्र नंतर विद्यार्थ्यांची संख्या अचानकच कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. यावर उपाय म्हणून आता शिष्यवृत्ती परीक्षेची फी विद्यार्थ्यांनी न भरता ती जिल्हा परिषदांनी आपल्या सेस फंडातून एकत्रित भरावी, असा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला असून त्याबाबत बुधवारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी अवगत करण्यात आले.

इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक आणि इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी घेतली जाते. १९५४-५५ पासून सुरू झालेल्या या परीक्षेला दरवर्षी १५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसत होते. मात्र आता ही संख्या अवघ्या सात ते आठ लाखांपर्यंत मर्यादित झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून परीक्षा परिषदेमार्फत शिक्षकांमध्ये जागृती आणून अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविण्याचे प्रयत्न केले जात आहे. तरीही हा आकडा आठ लाखांवर सरकलेला नाही. त्यामुळे गोरगरीब पालकांवर पडणारा परीक्षा शुल्काचा भार कमी करण्यासाठी परीक्षा परिषदेने जिल्हा परिषदांना व महापालिकांना मे महिन्यात शुल्काचा भार उचलण्याबाबत गळ घातली होती. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हा परिषदांनी ही फी भरण्यासाठी होकार दिला. त्याबद्दल परिषदेचे अध्यक्ष डाॅ. नंदकुमार बेडसे यांनी बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना व मनपा आयुक्तांना पत्र पाठवून आभारही मानलेत. तसेच यंदा या दोन्ही वर्गांच्या शिष्यवृत्ती रकमेतही अनुक्रमे पाच हजार आणि साडेसात हजार अशी वाढ करण्यात आली आहे. 

गेल्या सात वर्षातील परीक्षार्थी संख्या वर्ष : पाचवी : आठवी

  • २०१७ : ५,४५,९४० : ४,०३,३५९
  • २०१८ : ४,८८,८८१ : ३,७०,२४३
  • २०१९ : ५,१२,७६७ : ३,५३,३६८
  • २०२० : ५,७४,५८१ : ३,९७,५२३
  • २०२१ : ३,८८,५१५ : २,४४,३११
  • २०२२ : ४,१८,०५४ : ३,०३,८१७
  • २०२३ : ५,३२,८५७ : ३,६७,७९६

५० हजार शाळांवर ‘फोकस’परीक्षा परिषदेने २०२४ मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ५० हजार शाळांमधील १० लाख विद्यार्थ्यांना बसविण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पाचवीतील सहा लाख आणि आठवीतील चार लाख विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. २०२३-२४ या सत्राकरिता परिषदेने जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात ही विद्यार्थी संख्या गृहित धरून परीक्षेच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्षात २०१६ मध्ये परीक्षेला बसलेल्या १५ लाख विद्यार्थी संख्येपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

का घटली विद्यार्थी संख्या?ही शिष्यवृत्ती परीक्षा १९५४-५५ पासून सुरू झाल्यानंतर ती इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती. २०१४ मध्ये दोन्ही वर्ग मिळून १५ लाख ६० हजार आणि २०१५ मध्ये १५ लाख ९४ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परंतु, याच सुमारास शिक्षणाचा आकृतीबंध बदलला. प्राथमिक शिक्षण चौथीऐवजी पाचवीपर्यंत झाले आणि उच्च प्राथमिक शिक्षण पाचवीऐवजी सातवीपर्यंत झाले. याबाबतचा शासननिर्णय ऐन परीक्षेच्या काळात म्हणजे १५ फेब्रुवारी २०१६ रोजी निर्गमित झाला. त्यामुळे २०१६ मध्ये परीक्षाच घेता आली नाही. तर २०१७ पासून इयत्ता पाचवी आणि आठवीकरिता पुरीक्षा घेतली जात आहे. या बदलाचा परीक्षार्थी संख्येवर परिणाम झाल्याचे अनेक शिक्षकांचे मत आहे. 

टॅग्स :YavatmalयवतमाळScholarshipशिष्यवृत्ती