शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

जिल्हा परिषदेचा बिगूल वाजला

By admin | Updated: January 12, 2017 00:42 IST

जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगूल अखेर बुधवारी वाजला.

१६ फेब्रुवारीला मतदान : १६ पंचायत समित्यांमध्येही रणधुमाळी यवतमाळ : जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगूल अखेर बुधवारी वाजला. १६ फेब्रुवारी रोजी त्यासाठी मतदान घेतले जाणार असून त्याची मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ६२ जागा आणि १६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्याला या निवडणूक तारखांच्या घोषणेची प्रतीक्षा होती. इच्छुक उमेदवार अनेक महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र, बुधवारी मुंबईत निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केल्याने आता तयारीला आणखी वेग येणार आहे. जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. सध्या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता असून शिवसेना प्रमुख विरोधी पक्षात आहे. परंतु हे चित्र पूर्णत: उलटे करण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीत युतीला पोषक असलेल्या वातावरणाचा लाभ उठविण्याचा प्रयत्न निश्चित होणार आहे. जिल्ह्यात लोकसभा व विधानसभेत भाजपाचे वर्चस्व आहे. शहरी भागात भाजपाचे तर ग्रामीण भागात शिवसेनेचे वर्चस्व मानले जाते. त्यामुळे शिवसेना जोरदार तयारीला लागली आहे. २५ पेक्षा अधिक जागा मिळविण्याचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. संजय राठोड यांचे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद काढून घेतले गेल्याने भाजपाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला डिवचले आहे. याच कारणावरून भाजप-सेनेतील संबंध ताणले गेले आहे. शिवसेनेने स्वबळावर जिल्हा परिषदेत भाजपाला आडवे करण्याची घोषणा केली आहे. त्यावर भाजपाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी निकालातून सेनेला त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. हे ताणलेले वातावरण पाहता भाजप-शिवसेनेची युती होण्याची शक्यता कमीच आहे. जिल्ह्यात भाजपाकडे केंद्रीय गृह राज्यमंत्रिपद, पालकमंत्रिपद, पाच आमदार ऐवढी मोठी शक्ती असताना निवडणुकीत कुणाची साथ हवी कशाला, असा भाजपाच्या गोटातील सवाल आहे. एवढी शक्ती जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी पुरेशी असल्याचे कार्यकर्ते मानत आहे. जिल्ह्यात शिवसेनेकडे राज्यमंत्रिपद, खासदार आणि विधान परिषदेचे ‘वजनदार’ सदस्य आहेत. त्याबळावरच सेना जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना करीत आहे. गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता राहिली आहे. सध्याही सर्वाधिक २२ जागा काँग्रेसकडे आहे. परंतु दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र मोदीलाट व भाजपाला पोषक वातावरण असल्याने काँग्रेसला किती यश मिळेल, याबाबत साशंकता आहे. त्यातच नेत्यांमधील गटबाजी प्रचंड उफाळून आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना एका छत्राखाली आणणार कोण, हा प्रश्न आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सत्तेबाहेर करण्यासाठी भाजप व सेनेची मंडळी जोरदार तयारीला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आहे. परंतु आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोडकळीस आल्याचे चित्र आहे. पुसद वगळता कुठेही राष्ट्रवादीची ताकद दिसून येत नाही. भविष्यातील वाटचालीचा अंदाज आल्याने या पक्षातील अनेकांनी भाजपाच्या वाटेवर जाण्याची तयारी चालविली आहे. लवकरच राष्ट्रवादीचा पोळा फुटणार आहे. मनसे नगरपरिषद निवडणुकीत उघडी पडल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये त्यांचे अस्तित्व राहणार की नाही, याबाबत राजकीय गोटात साशंकता व्यक्त केली जात आहे. अनेकांचे जिल्हा परिषद सर्कल आरक्षित झाल्याने त्यांना एक तर शेजारील सर्कलमध्ये धाव घ्यावी लागत आहे किंवा पंचायत समितीचा विचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)