शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या पुन्हा कोरोनाच्या नावाने लांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:00 IST

राज्य शासनाने बदली प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकदाच जिल्हांतर्गत बदल्यांचा लाभ शिक्षकांना मिळाला. त्यात तांत्रिक कारणांमुळे अनेकांवर अन्याय झाल्याची ओरड आहे. कारण नसताना अनेक जण दुर्गम गावांमध्ये अडकून पडले. महागाव, उमरखेड, झरी जामणी, मारेगाव सारख्या तालुक्यांमध्ये शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला. तर यवतमाळात अधिकाधिक शिक्षकांनी बदल्या मिळवून घेतल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दोन वर्षांपासून बदल्यांची प्रक्रियाच न झाल्याने दुर्गम गावातील अनेक शिक्षक यंदा बदली प्रक्रियेकडे आस लावून बसले आहेत. मात्र आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याशिवाय बदली प्रक्रिया राबविली जाणार नसल्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे यंदाच्या सत्रात बदल्याच होणार नसल्याची भीती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.राज्य शासनाने बदली प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकदाच जिल्हांतर्गत बदल्यांचा लाभ शिक्षकांना मिळाला. त्यात तांत्रिक कारणांमुळे अनेकांवर अन्याय झाल्याची ओरड आहे. कारण नसताना अनेक जण दुर्गम गावांमध्ये अडकून पडले. महागाव, उमरखेड, झरी जामणी, मारेगाव सारख्या तालुक्यांमध्ये शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला. तर यवतमाळात अधिकाधिक शिक्षकांनी बदल्या मिळवून घेतल्या.संवर्ग-४ मधील शिक्षक आणि गेल्या वेळी विस्थापित झालेले शिक्षक आतूरतेने बदली प्रक्रियेची वाट पाहत आहे. गेल्या वर्षी सुरू झालेली बदली प्रक्रिया ऐनवेळी कोरोनाच्या कारणाखाली रद्द करण्यात आली. यावर्षीही सुरुवातीला ग्रामविकास विभागाने बदलीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र ३ ऑगस्ट रोजी सध्याच शिक्षकांच्या बदल्या न करण्याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा सध्या कोरोनामुळे प्रत्यक्ष सुरु करणे शक्य नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरच शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.राज्यस्तरावरून ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया होणार आहे. मात्र युती सरकारच्या काळातील बदली पोर्टलमध्ये चुका असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारने नवे पोर्टल तयार करण्याचा घाट घातला आहे. परंतु नवे पोर्टल नेमके कधी तयार होणार याबाबत निश्चित माहिती देण्यास शिक्षण खात्यातील एक अधिकारी सध्या तयार नाही. तर दुसरीकडे शिक्षकांमधून विनंती बदल्या जिल्हास्तरावरच समूपदेशनाद्वारेच तातडीने करण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्हा परिषदेतील अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांसह खुद्द शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या. 

शाळा उघडणार का, बदलीला वेळ मिळणार का ?- सध्या कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा उघडणे शक्य नसल्याचे ग्रामविकास विभागाच्या आदेशात म्हटले आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतरच शिक्षकांच्या बदलीचा विचार होणार आहे. परंतु दरवेळी शिक्षकांच्या बदल्या साधारण जूनपूर्वी म्हणजेच प्रत्यक्ष शाळा सुरू हाेण्यापूर्वी केल्या जातात. त्यामुळे नव्या सत्रात शिक्षकांना नवी शाळा ‘जॉईन’ करणे सोपे जाते. विद्यार्थ्यांसाठीही ते सोईचे ठरते. मात्र आता शाळा सुरू झाल्यावर बदल्या करण्याचे शासनाने जाहीर केले. शाळा सुरू असताना शिक्षक बदलल्यास विद्यार्थ्यांची अडचण अधिक वाढणार आहे.

प्रत्यक्ष समूपदेशन झाले, मग ऑनलाईनला अडचण का ? - ग्रामविकासच्या आदेशानुसारच जिल्हा परिषदेने नुकत्याच गट क आणि ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या समूपदेशनातून केल्या. त्यावेळी एकही कर्मचारी कोरोनाबाधित झाला नाही किंवा कोरोना नियमाचेही उल्लंघन झाले नाही. याशिवाय महसूल खात्यानेही बदली प्रक्रिया पार पाडली. मात्र केवळ शिक्षकांची बदली प्रक्रिया तीही बहुतांश ऑनलाईन असतानाही कोरोनाच्या कारणाखाली टाळली गेली. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTransferबदली