शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

जिल्हा परिषद : कृषी, बांधकाम, समाजकल्याणच्या योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 21:56 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांकडे कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे. मार्च महिना तोंडावर आल्याने हा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा निधी अखर्चित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांकडे कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे. मार्च महिना तोंडावर आल्याने हा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे १२ कोटी, बांधकामकडे रस्ते दुरूस्ती व परीरक्षणाचे तीन कोटी, कोलाम पोड जोडणी रस्त्याचे १० कोटी, आरोग्य विभागाकडे तीन कोटी, समाजकल्याणकडे पाच कोटींच्यावर, असा कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे. शासनाने विविध योजनांच्या पूर्ततेसाठी हा निधी उपलब्ध करून दिला. गेल्या नऊ महिन्यात बहुतांश विभागांना हा निधी खर्ची घालता आला नाही. विशेष म्हणजे यात मागील आर्थिक वर्षात शिल्लक राहिलेल्या काही निधीचा समावेश आहे. तो निधी या वर्षात खर्च करण्याची परवानगी घेण्यात आली होती. तरीही तो खर्च झाला नाही.समाजकल्याण विभागातर्फे १७ विविध योजना राबविण्यात येतात. त्यात शेतकºयांना ताडपत्री, स्प्रे पंप, शीलाई मशीन, भजनी साहित्य, आॅईल इंजिन पुरविणे आदी योजनांचा समावेश आहे. त्यासाठी कोट्यवधींचा निधी आला. मात्र तो अखर्चित आहे. लाभार्थ्यांकडून अर्जच येत नसल्याची लंगडी सबब त्यासाठी सांगितली जात आहे.कृषी विभागाकडे एकट्या सेस फंडातील सव्वा दोन कोटी रूपये पडून आहे. त्यामुळे शेतकºयांना अद्याप इलेक्ट्रीक मोटर पंप, डिझेल इंजिन, स्प्रे पंप, हॅन्ड स्प्रे पंप, ताडपत्री, पीव्हीसी पाईप, आदी साहित्य मिळाले नाहे. परिणामी दोन कोटी २२ लाख रूपये पडून आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद