शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
4
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
5
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
6
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
7
पार्थ पवारांसाठी दुय्यम निबंधकांचा 'हातभार', जमीन स्थावर मालमत्ता असताना दाखवली जंगम, गैरवापर केल्याचे अहवालातून स्पष्ट
8
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
9
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
10
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
11
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
12
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
13
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
14
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
15
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
16
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
17
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
18
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
19
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
20
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसची ‘वीरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 20:51 IST

प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला.

ठळक मुद्देकृत्रिम पाणीटंचाई : यवतमाळात १५ दिवसांपासून नळच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला. या विरोधात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी दर्डानगर पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी आंदोलन केले.शहरातील वाघापूर, लोहारा परिसरात नळाचे पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांना पुन्हा टँकरने पाणी आणावे लागत आहे. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या दूषित पाण्यामुळे अनेकांना ताप, जुलाब व त्वचेचे आजार झाले होते. प्रभाग १४, १५, २५, २६ मध्ये नळाचे पाणीच नाही. दर्डानगर व सुयोगनगर पाण्याच्या टाकीवरून पुरवठा होणेच बंद आहे. झाला तरी अतिशय अशुद्ध पाणी दिले जाते. वाघापूर परिसरातील वैशालीनगर, जयविजयचौक, नेताजीनगर, अंबानगर, पटवारी कॉलनी, राजस्व कॉलनी, पारसनगरी, वैभवनगर, राऊतनगर, मैथिलीनगर, चाणक्यनगर, एकतानगर, सिध्देश्वरनगर, शुभम कॉलनी, महाविरनगर, सानेगुरूजीनगर परिसरात सातत्याने दूषित पाणीपुरवठा केला. आता १५ दिवसापासून नळच नाही. यामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दर्डानगर पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, युवकचे यवतमाळ विधानसभाध्यक्ष विक्की राऊत, काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष उषा दिवटे, घनश्याम अत्रे, उमेश इंगळे, अरूण ठाकूर, अजय किन्हीकर, दत्ता हाडके, राजस तेलगोटे उपस्थित होते. सुमारे दीड तास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्यानंतर कोणीच दखल न घेतल्याने पदाधिकाºयांनी जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले. तेथेही कोणीच जबाबदार अधिकारी नसल्याने अखेर लिपिकाला निवदेन दिले.तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणारशहरात एकाच वेळी अनेक कामे सुरू आहे. वीज कंपनी भूमिगत केबल टाकत असताना पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन मार्इंदे चौकात फुटली. या दुरूस्ती कामातही अनेक अडथळे येत आहे. येथे काम करताना एका कामगाराला विजेचा शॉक लागल्याची माहिती आहे. त्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहराचाच पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जीवन प्राधिकरणच्या सूत्राने सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस