शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

युवक काँग्रेसची ‘वीरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 20:51 IST

प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला.

ठळक मुद्देकृत्रिम पाणीटंचाई : यवतमाळात १५ दिवसांपासून नळच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला. या विरोधात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी दर्डानगर पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी आंदोलन केले.शहरातील वाघापूर, लोहारा परिसरात नळाचे पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांना पुन्हा टँकरने पाणी आणावे लागत आहे. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या दूषित पाण्यामुळे अनेकांना ताप, जुलाब व त्वचेचे आजार झाले होते. प्रभाग १४, १५, २५, २६ मध्ये नळाचे पाणीच नाही. दर्डानगर व सुयोगनगर पाण्याच्या टाकीवरून पुरवठा होणेच बंद आहे. झाला तरी अतिशय अशुद्ध पाणी दिले जाते. वाघापूर परिसरातील वैशालीनगर, जयविजयचौक, नेताजीनगर, अंबानगर, पटवारी कॉलनी, राजस्व कॉलनी, पारसनगरी, वैभवनगर, राऊतनगर, मैथिलीनगर, चाणक्यनगर, एकतानगर, सिध्देश्वरनगर, शुभम कॉलनी, महाविरनगर, सानेगुरूजीनगर परिसरात सातत्याने दूषित पाणीपुरवठा केला. आता १५ दिवसापासून नळच नाही. यामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दर्डानगर पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, युवकचे यवतमाळ विधानसभाध्यक्ष विक्की राऊत, काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष उषा दिवटे, घनश्याम अत्रे, उमेश इंगळे, अरूण ठाकूर, अजय किन्हीकर, दत्ता हाडके, राजस तेलगोटे उपस्थित होते. सुमारे दीड तास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्यानंतर कोणीच दखल न घेतल्याने पदाधिकाºयांनी जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले. तेथेही कोणीच जबाबदार अधिकारी नसल्याने अखेर लिपिकाला निवदेन दिले.तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणारशहरात एकाच वेळी अनेक कामे सुरू आहे. वीज कंपनी भूमिगत केबल टाकत असताना पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन मार्इंदे चौकात फुटली. या दुरूस्ती कामातही अनेक अडथळे येत आहे. येथे काम करताना एका कामगाराला विजेचा शॉक लागल्याची माहिती आहे. त्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहराचाच पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जीवन प्राधिकरणच्या सूत्राने सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस