शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

युवक काँग्रेसची ‘वीरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 20:51 IST

प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला.

ठळक मुद्देकृत्रिम पाणीटंचाई : यवतमाळात १५ दिवसांपासून नळच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला. या विरोधात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी दर्डानगर पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी आंदोलन केले.शहरातील वाघापूर, लोहारा परिसरात नळाचे पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांना पुन्हा टँकरने पाणी आणावे लागत आहे. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या दूषित पाण्यामुळे अनेकांना ताप, जुलाब व त्वचेचे आजार झाले होते. प्रभाग १४, १५, २५, २६ मध्ये नळाचे पाणीच नाही. दर्डानगर व सुयोगनगर पाण्याच्या टाकीवरून पुरवठा होणेच बंद आहे. झाला तरी अतिशय अशुद्ध पाणी दिले जाते. वाघापूर परिसरातील वैशालीनगर, जयविजयचौक, नेताजीनगर, अंबानगर, पटवारी कॉलनी, राजस्व कॉलनी, पारसनगरी, वैभवनगर, राऊतनगर, मैथिलीनगर, चाणक्यनगर, एकतानगर, सिध्देश्वरनगर, शुभम कॉलनी, महाविरनगर, सानेगुरूजीनगर परिसरात सातत्याने दूषित पाणीपुरवठा केला. आता १५ दिवसापासून नळच नाही. यामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दर्डानगर पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, युवकचे यवतमाळ विधानसभाध्यक्ष विक्की राऊत, काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष उषा दिवटे, घनश्याम अत्रे, उमेश इंगळे, अरूण ठाकूर, अजय किन्हीकर, दत्ता हाडके, राजस तेलगोटे उपस्थित होते. सुमारे दीड तास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्यानंतर कोणीच दखल न घेतल्याने पदाधिकाºयांनी जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले. तेथेही कोणीच जबाबदार अधिकारी नसल्याने अखेर लिपिकाला निवदेन दिले.तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणारशहरात एकाच वेळी अनेक कामे सुरू आहे. वीज कंपनी भूमिगत केबल टाकत असताना पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन मार्इंदे चौकात फुटली. या दुरूस्ती कामातही अनेक अडथळे येत आहे. येथे काम करताना एका कामगाराला विजेचा शॉक लागल्याची माहिती आहे. त्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहराचाच पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जीवन प्राधिकरणच्या सूत्राने सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस