शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

तंटामुक्तीसाठी आता तरुणांचा पुढाकार

By admin | Updated: February 1, 2015 23:06 IST

शांततेतून समृद्धीकडे हे ब्रीद असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यभर तरुणांचा सक्रिय सहभाग वाढावा व भविष्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात क्रियाशील व सृजन

पुसद : शांततेतून समृद्धीकडे हे ब्रीद असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यभर तरुणांचा सक्रिय सहभाग वाढावा व भविष्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात क्रियाशील व सृजन नेतृत्व निर्माण व्हावे, या हेतूने विविध शाळा व महाविद्यालयात वाद-विवाद, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यावर शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता तंटामुक्तीसाठी राज्यातील तरुणाई सरसावणार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत राज्यातील २७ हजारांवर ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत तब्बल १७ हजारांवर गावे तंटामुक्त करण्यात मोहिमेला यश आले आहे. त्यामुळे राज्यातील गावागावात एक लोकचळवळ भक्कमपणे उभी राहिली आहे. या अभियानात तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा या हेतूने आता शाळा व महाविद्यालयातून वाद-विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे व्यापक प्रमाणात आयोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहे. त्यानुसार तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत आता लवकरच शाळा, महाविद्यालयात सदर स्पर्धा रंगणार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला शासनाच्या गृह विभागाच्यावतीने सन २००७-०८ पासून प्रारंभ झाला आहे. मोहिमेच्या पहिल्याच वर्षी २३२८ गावे तंटामुक्त घोषित करण्यात आली. या पैकी २५२ गावांना विशेष शांतता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मोहिमेच्या दुसऱ्या वर्षी अर्थात सन २००८-०९ मध्ये २८९१ गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली. तर त्यापैकी २६५ गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविला. मोहिमेच्या तिसऱ्या वर्षी म्हणजे २००९-१० मध्ये ४२६४ गावे तंटामुक्त होवून यापैकी ३६२ गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली. मोहिमेच्या चौथ्या वर्षी २०१०-११ मध्ये ३८२४ गावे तंटामुक्त झाली. तर २७१ गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली. मोहिमेच्या पाचव्या वर्षी म्हणजे २०११-१२ मध्ये २४७१ गावे तंटामुक्त होवून यापैकी ७५ गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविला. मोहिमेच्या सहाव्या वर्षी २०१२-१३ मध्ये १७४१ गावे तंटामुक्त झाली. तर ४७ गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविले. अर्थात आतापर्यंत राज्यातील १७६६५ गावे तंटामुक्त होवून त्यापैकी १२७० गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविले आहे. विशेष शांतता पुरस्कार पटकाविणाऱ्या गावांनी २०० पैकी १९० किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले, हे विशेष. यंदा मोहिमेचे सातवे वर्ष सुरू आहे. तंटामुक्त मोहिमेत सहभागी गावांनी १ मे रोजी ग्रामसभा घेऊन आपले गाव तंटामुक्त घोषित करण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरू केली आहे. या मोहिमेसाठी आता तरुणाईचा सक्रिय सहभाग मिळणार असल्याने या मोहिमेची गती वाढण्यास मदत होणार आहे. राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयात तंटामुक्तीवर आधारित विविध स्पर्धांच्या आयोजनामुळे तंटे निवारण्याच्या पद्धतीचे आकलन युवावर्गाला होणार आहे. त्यातून गावागावात शांतता प्रस्तापित करण्यास फायदा होणार आहे. ग्रामस्थांमधूनही चांगला प्रतिसाद लाभण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)