शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

आर्णी येथे युवकाचा जुन्या वादातून चाकूने भोसकून खून: ४ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2023 22:02 IST

मृत व आरोपींमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद होता. त्यांच्यात नेहमी खटके उडत होते.

राजेश कुशवाह

आर्णी (यवतमाळ) : जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास येथील देऊरवाडा पुनर्वसन येथे घडली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. शेख समीर शेख मुश्ताक (२४) रा.शास्त्रीनगर, आर्णी असे मृताचे नाव आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी शेख अजीस शे.शमी (३६), शेख अरबाज शे.रहीम (३०), जुबेर खान साहेब खान (२४) व सय्यद दानिश सय्यद जहागीर (२६) सर्व रा.देऊरवाडा पुनर्वसन, आर्णी यांना अटक केली. वृत्त लिहिस्तोवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

मृत व आरोपींमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद होता. त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. मृत शेख समीर शेख मुश्ताक हा मंगळवारी रात्री देऊरवाडा भागात आल्याची माहिती आरोपींना मिळाली. चौघेही एका दुचाकीने या भागात पोहोचले. त्याठिकाणी शेख समीर शेख मुश्ताक याच्यावर चाकूने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मारेकरी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांना तेथे अटक करण्यात आली. मारेकऱ्यांनी या घटनेसाठी वापरलेली दुचाकी शास्त्रीनगरातील एका व्यक्तीची असल्याची माहिती आहे.