शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

यवतमाळातील कळब चौक येथे गोळ्या घालून युवकाची हत्या; तस्करीचा रेतीचा वाद

By सुरेंद्र राऊत | Updated: February 6, 2024 23:43 IST

चार गोळ्या झाडून हल्लेखोर पसार

यवतमाळ : शहरातील कळंब चौक येथे चार जणांनी रेती तस्करीतील पैस्याच्या वादातून युवकाची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री 10: 45 वाजता घडली. या घटनेने शहरात एकच खबळ उडाली आहे. 

शादाब खान रफिक खान रा. तायडे नगर यवतमाळ असे मृताचे नाव आहे.  त्याच्यावर अंबिका नगर पातीपुरा येथील चौघांनी गोळीबार केला. यात एक गोळी थेट छातीत लागल्याने शादाबचा मृत्यू झाला. शादाब नेहमी प्रमाणे कळंब चौक येथील कॅन्टीनवर  चहा घेत असताना, मनीष शेंदरे रा अंबिका नगर हा त्याच्या तीन मित्रांसह आला. शादाब सोबत त्यांचा रेतीच्या पैस्यावरून वाद झाला. यात आरोपींनी गोळीबार केला, त्यानंतर लगेच घटना स्थळावरून पळ काढला, नागरिकांनी जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी शादाब ला मृत घोषित केले, घटनेची माहिती मिळताच कळंब चौक येथे मोठा जमाव जमला, घटनास्थळ परिसरात आरोपीची असलेली दुचाकी जाळण्यात आली. 

तणाव वाढत असल्याने खुद्द पोलिस अधिक्षक डॉ पवन बनसोड घटनास्थळी पोहोचले आहे, पोलिस संशयित आरोपीच्या घराची झडती घेत आहे, त्या परिसरात बंदोबस्त लावला आहे. वृत्त लिहीपर्यंत यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.