शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

घाटंजी येथे युवक काँग्रेसचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:40 IST

तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँगे्रस कमिटी, तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या पुढाकारात येथे युवकांचा मेळावा घेण्यात आला.

ऑनलाईन लोकमतघाटंजी : तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँगे्रस कमिटी, तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या पुढाकारात येथे युवकांचा मेळावा घेण्यात आला.मेळाव्याला माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी संबोधित केले. केंद्र सरकार केवळ आश्वासने देत आहे. नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचा विसर सरकारला पडला. १५ लाख तर सोडा २५ हजार लोकांनाही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. शासकीय आणि खासगी नोकºयांचे प्रमाण कमी झाल्याने बेरोजगारांचा प्रश्न वाढत चालला आहे. याला सत्ताधारी जबाबदार असल्याचे ते म्हणाले.माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनीही मार्गदर्शन केले. या सरकारच्या काळात जातीयवाद व धर्मवाद वाढला आहे. देशाच्या हिताचे कुठलेही निर्णय या सरकारने घेतलेले नाही, असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा महिली काँग्रेस अध्यक्ष माधुरीताई अराठे, जितेंद्र मोघे, मारोतराव पवार, अनिल आडे, विष्णू राठोड, सुनील भारती, सिकंदर शहा, श्रीनिवास नालमवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.संचालन गणेश मुद्दलवार यांनी, तर आभार राजू निकोडे यांनी मानले. मेळाव्यासाठी तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष मयूरी मनोज मेश्राम, शोभा ठाकरे, विद्या सलाम, डॉ. विजय कडू, मारोतराव पवार, इकलाख खान, माणिकराव मेश्राम, किशोर दावडा, सुभाष गोडे, नगरसेवक परेश कारिया, मुरलीचे सरपंच राजू चौधरी, सरपंच मनोज मेश्राम, अनिल राठोड, अनिल बावने, प्रमोद राठोड, गणेश उन्नरकर, बबलू राठोड, राजेश निकोडे, राजू मुनेश्वर, विनोद मुनगीनवार, अमृत पेंदोर, राम बाजपेयी, वामन अवधुतकार, बालाजी पोटपेल्लीवार आदींनी पुढाकार घेतला.जनआक्रोश मोर्चायुवक काँग्रेसच्यावतीने घाटंजी येथे जनआक्रोश मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, विधिमंडळात जाहीर केल्याप्रमाणे बोंडअळीग्रस्तांना कुठलेही निकष न लावता योग्य मोबदला द्यावा, निराधार, वृद्धापकाळ व संजय गांधी योजनांच्या लाभार्थ्यांना वाढ करून योग्यवेळी मानधन वाटप करावे, मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची कामे त्वरित सुरू करावी, पाणी टंचाई उपाययोजना तत्काळ हाती घ्याव्या, नळ योजनेची वीज तोडणे थांबवावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

टॅग्स :congressकाँग्रेस