शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

तुम्हीच आमचे मालक, म्हणून भेटीसाठी आलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:55 IST

तुम्हीच आमचे मालक आहात. तुम्हीच राजे. म्हणूनच आम्ही काम केले हे तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या दर्शनाकरिता ही महाजनादेश यात्रा आहे. जनतेत जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे, अशी कृतज्ञ भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : राळेगावातील सभेत मुख्यमंत्र्यांची कृतज्ञता

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तुम्हीच आमचे मालक आहात. तुम्हीच राजे. म्हणूनच आम्ही काम केले हे तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या दर्शनाकरिता ही महाजनादेश यात्रा आहे. जनतेत जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे, अशी कृतज्ञ भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.सोमवारी सायंकाळी राळेगाव येथे जाहीर सभेत ते बोलत होते. महाराष्ट्र पालथा घालण्यासाठी निघालेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सोमवारी वडकी-खैरी मार्गे जिल्ह्यात दाखल झाली. राळेगाव आणि यवतमाळ अशा दोन ठिकाणी जाहीर सभा झाल्या.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या मतदारसंघातील विविध विकास कामांवर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. राज्यातील ५० हजार आदिवासी मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला. तर एक लाख मुलांना आश्रमशाळांमधून उत्तम शिक्षण दिले जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी या सरकारने ५० हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली जाणार आहे.यावेळी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके म्हणाले, राळेगाव मतदारसंघातील विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी नेहमीच सहकार्य केले. बेंबळा प्रकल्प प्राधान्याने पूर्णत्वास जावा, शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठीच मतदारसंघात महामार्ग देण्यात आला. रोजगार वाढविण्यासाठी सूतगिरणीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.यवतमाळ येथील जाहीर सभेत मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, ना. संजय कुंटे, पालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार प्रवीण पोटे, आमदार निलय नाईक, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार राजू तोडसाम, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, वणी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे उपस्थित होते. राळेगावच्या सभेचे संचालन भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब कविश्वर यांनी केले.विरोधकांना मुख्यमंत्र्यांचे चिमटेजनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही शरसंधान साधले. भाषण करताना मी वारंवार पाणी पितो, कारण मला काँग्रेसला पाणी पाजायचे आहे. काँग्रेसला साधा स्वत:चा अध्यक्षही निवडता येत नाही. त्यांनी आता मुंबईतील गर्दीत चिठ्ठी टाकून अध्यक्ष निवडावा, असे म्हणतानाच त्यांनी राष्ट्रवादीलाही लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस आता फक्त पवार कुटुंबाचीच उरली आहे. २२ विरोधी पक्षांचे लोक इव्हीएम विरोधात एकत्र आले आहे. मात्र त्यांना जनतेच्या प्रश्नांचे देणे-घेणे नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.