शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच आमचे मालक, म्हणून भेटीसाठी आलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:55 IST

तुम्हीच आमचे मालक आहात. तुम्हीच राजे. म्हणूनच आम्ही काम केले हे तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या दर्शनाकरिता ही महाजनादेश यात्रा आहे. जनतेत जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे, अशी कृतज्ञ भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : राळेगावातील सभेत मुख्यमंत्र्यांची कृतज्ञता

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तुम्हीच आमचे मालक आहात. तुम्हीच राजे. म्हणूनच आम्ही काम केले हे तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या दर्शनाकरिता ही महाजनादेश यात्रा आहे. जनतेत जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे, अशी कृतज्ञ भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.सोमवारी सायंकाळी राळेगाव येथे जाहीर सभेत ते बोलत होते. महाराष्ट्र पालथा घालण्यासाठी निघालेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सोमवारी वडकी-खैरी मार्गे जिल्ह्यात दाखल झाली. राळेगाव आणि यवतमाळ अशा दोन ठिकाणी जाहीर सभा झाल्या.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या मतदारसंघातील विविध विकास कामांवर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. राज्यातील ५० हजार आदिवासी मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला. तर एक लाख मुलांना आश्रमशाळांमधून उत्तम शिक्षण दिले जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी या सरकारने ५० हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली जाणार आहे.यावेळी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके म्हणाले, राळेगाव मतदारसंघातील विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी नेहमीच सहकार्य केले. बेंबळा प्रकल्प प्राधान्याने पूर्णत्वास जावा, शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठीच मतदारसंघात महामार्ग देण्यात आला. रोजगार वाढविण्यासाठी सूतगिरणीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.यवतमाळ येथील जाहीर सभेत मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, ना. संजय कुंटे, पालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार प्रवीण पोटे, आमदार निलय नाईक, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार राजू तोडसाम, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, वणी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे उपस्थित होते. राळेगावच्या सभेचे संचालन भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब कविश्वर यांनी केले.विरोधकांना मुख्यमंत्र्यांचे चिमटेजनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही शरसंधान साधले. भाषण करताना मी वारंवार पाणी पितो, कारण मला काँग्रेसला पाणी पाजायचे आहे. काँग्रेसला साधा स्वत:चा अध्यक्षही निवडता येत नाही. त्यांनी आता मुंबईतील गर्दीत चिठ्ठी टाकून अध्यक्ष निवडावा, असे म्हणतानाच त्यांनी राष्ट्रवादीलाही लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस आता फक्त पवार कुटुंबाचीच उरली आहे. २२ विरोधी पक्षांचे लोक इव्हीएम विरोधात एकत्र आले आहे. मात्र त्यांना जनतेच्या प्रश्नांचे देणे-घेणे नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.