शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

होय, काँग्रेस नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला

By admin | Updated: May 23, 2014 00:13 IST

काँग्रेसमधील प्रवाह थांबला आहे, नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कमी झाला आहे, पक्षात नव्याने येणार्‍यांची संख्याही घटली आहे. हीच कारणे लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी कारणीभूत ठरली,

आमदार-पदाधिकार्‍यांची कबुली : लोकसभेतील पराभवाची मुंबईत कारणमीमांसा

यवतमाळ : काँग्रेसमधील प्रवाह थांबला आहे, नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कमी झाला आहे, पक्षात नव्याने येणार्‍यांची संख्याही घटली आहे. हीच कारणे लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी कारणीभूत ठरली, अशा शब्दात जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी मुंबईत कबुली दिली. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे ९२ हजार मतांनी पराभूत झाले. काँग्रेसचा बालेकिल्ला असताना शिवसेनेच्या भावना गवळी निवडून आल्या. विशेष असे काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघातच शिवसेनेला सर्वाधिक मते मिळाली. या पार्श्वभूमीवर मोघेंच्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी बुधवार २१ मे रोजी मुंबईत जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार व प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक बोलविण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे असताना काँग्रेस उमेदवाराचा लोकसभेत पराभव का झाला याच्या कारणांवर चर्चा झाली. प्रत्येक आमदार व पदाधिकार्‍यांनी आपली बाजू मांडली. त्यात प्रकर्षाने कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय पुढे आला. काँग्रेसमध्ये वर्षानुवर्षे विशिष्टच लोक मंत्री, आमदार, पदाधिकारी राहत आहे. त्यांच्या खात्यातही बदल होत नाही. आपला वारसा कार्यकर्त्याकडे सोपविण्याऐवजी घरातीलच व्यक्तीकडे सोपविला जातो. पक्षात संपर्क राहिला नाही, पक्षातील प्रवाह जणू थांबला आहे. वरचे लोक वर आणि खालचे कार्यकर्ते खाली अशी स्थिती आहे. पक्षात नव्याने येणार्‍यांची संख्या थांबली आहे. काही विशिष्ट लोकांनी आपल्या जागा फिक्स केल्या आहेत, आदीबाबी चर्चेतून पुढे आल्या. उपस्थित आमदारांनीही ही कारणे मान्य केली. काँग्रेसच्या पराभवाला खिळखिळे झालेले पक्ष संघटन यासोबतच भाजपासोबत राहिलेला मीडिया, त्याचा ग्रामीण मतदारांवर पडलेला प्रभाव, सत्तेतील सहकारी पक्ष राष्टÑवादी काँग्रेसने काम न केल्याबाबत अनेक भागातून आलेल्या तक्रारी हीसुद्धा कारणे तेवढीच महत्वाची ठरल्याचे सांगितले गेले. या सर्व तक्रारी व पराभवाची कारणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी मार्गदर्शन केले. पराभवाच्या कारणांचा फार विचार न करता सकारात्मक दृष्टीने विधानसभा निवडणुकांची तयारी करा, असा सल्ला वजा आदेश ठाकरे यांनी उपस्थितांना दिला. शासनाच्या अनेक योजना चांगल्या आहेत, मात्र त्याची जनजागृती व अंमलबजावणी झाली नसल्याची बाब यावेळी मांडण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शेतकरी, कर्ज, व्याजदर, अनुदानाच्या लाभार्थ्यांना अद्यापही न मिळालेल्या रकमा, कापसाचे दर, सिंचन, अन्न सुरक्षा योजना, जीवनदायी योजना यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. लोकसभेत पराभव झाला मात्र आता विधानसभेचा विचार करा, भविष्यात काय करायचे हे ठरवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित आमदार व पदाधिकार्‍यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)