शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

यंदाही राज्यात खर्चावर आधारित हमीदर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार सत्तेत आल्यास उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी दर मिळेल, अशी घोषणा आर्णी तालुक्याच्या दाभडीत लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. मात्र चार वर्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची निराशाकेंद्रीय कृषीमूल्य आयोगाने केली हमी दराची घोषणा

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार सत्तेत आल्यास उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी दर मिळेल, अशी घोषणा आर्णी तालुक्याच्या दाभडीत लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. मात्र चार वर्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प कृषीला समर्पित असेल असा गाजावाजा केंद्र शासनाने केला. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी दरात मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात क्ंिवटल मागे ८० ते ४०० रुपयांचे वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे यंदाच्या हंगामातही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमी दर मिळणार नाही, हे निश्चित.वर्षभरात निवडणुका आल्याने यावर्षी शेतमालाला चांगले हमी भाव मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात कृषी मूल्य आयोगाने शेतमालाचे हमी दर नुकतेच जाहीर केले. या हमी दरानुसार आधारभूत किंमत घेऊन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. जाहीर झालेल्या आधारभूत किंमतीनुसार खासगी व्यापाऱ्यांना शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे. मुळातच जाहीर झालेले शेतमालाचे दर कवडीमोल आहे. यामध्ये शेतमालाला लागणाऱ्या खर्चाचा कुठेही विचार झाला नाही. मानवी श्रमही मोजले गेले नाही. कृषीमूल्य आयोगाने घोषित केलेल्या दरामध्ये कापूस ४४८० रुपये हमी दर निश्चित करण्यात आला. त्यात क्ंिवटल मागे १६० रुपयांची वाढ आहे. तर सोयाबीनला ३३२५ रुपये हमी दर दिला असून त्यात क्ंिवटल मागे २७५ रुपयांची वाढ आहे. ज्वारी १७७५, बाजरी १५७५, मूग ५९२५, उडीद ५८०० आणि तूर ५८५० रुपये हमी दर जाहीर करण्यात आला आहे.आधारभूत किंमत न वाढण्याची ही आहेत कारणेदरवर्षी मजुरीचे दर वाढत आहे. सोबतच बियाणे, कीटकनाशके आणि खतांच्या किंमती वाढत आहे. हमी दर जाहीर करताना या सर्व बाबींचा विचार केला जातो. हा खर्च वजा जाता शेतमालाच्या किंमती निश्चित करायच्या असतात. प्रत्यक्षात हा नियम कागदावर राहतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील शेतमजुरीचे आणि खर्चाच्या दराचे ताळेबंद वापरले जातात. त्यामुळे आधारभूत किंमत वाढली नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी