शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

यंदाही राज्यात खर्चावर आधारित हमीदर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार सत्तेत आल्यास उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी दर मिळेल, अशी घोषणा आर्णी तालुक्याच्या दाभडीत लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. मात्र चार वर्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची निराशाकेंद्रीय कृषीमूल्य आयोगाने केली हमी दराची घोषणा

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार सत्तेत आल्यास उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी दर मिळेल, अशी घोषणा आर्णी तालुक्याच्या दाभडीत लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. मात्र चार वर्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प कृषीला समर्पित असेल असा गाजावाजा केंद्र शासनाने केला. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी दरात मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात क्ंिवटल मागे ८० ते ४०० रुपयांचे वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे यंदाच्या हंगामातही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमी दर मिळणार नाही, हे निश्चित.वर्षभरात निवडणुका आल्याने यावर्षी शेतमालाला चांगले हमी भाव मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात कृषी मूल्य आयोगाने शेतमालाचे हमी दर नुकतेच जाहीर केले. या हमी दरानुसार आधारभूत किंमत घेऊन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. जाहीर झालेल्या आधारभूत किंमतीनुसार खासगी व्यापाऱ्यांना शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे. मुळातच जाहीर झालेले शेतमालाचे दर कवडीमोल आहे. यामध्ये शेतमालाला लागणाऱ्या खर्चाचा कुठेही विचार झाला नाही. मानवी श्रमही मोजले गेले नाही. कृषीमूल्य आयोगाने घोषित केलेल्या दरामध्ये कापूस ४४८० रुपये हमी दर निश्चित करण्यात आला. त्यात क्ंिवटल मागे १६० रुपयांची वाढ आहे. तर सोयाबीनला ३३२५ रुपये हमी दर दिला असून त्यात क्ंिवटल मागे २७५ रुपयांची वाढ आहे. ज्वारी १७७५, बाजरी १५७५, मूग ५९२५, उडीद ५८०० आणि तूर ५८५० रुपये हमी दर जाहीर करण्यात आला आहे.आधारभूत किंमत न वाढण्याची ही आहेत कारणेदरवर्षी मजुरीचे दर वाढत आहे. सोबतच बियाणे, कीटकनाशके आणि खतांच्या किंमती वाढत आहे. हमी दर जाहीर करताना या सर्व बाबींचा विचार केला जातो. हा खर्च वजा जाता शेतमालाच्या किंमती निश्चित करायच्या असतात. प्रत्यक्षात हा नियम कागदावर राहतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील शेतमजुरीचे आणि खर्चाच्या दराचे ताळेबंद वापरले जातात. त्यामुळे आधारभूत किंमत वाढली नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी