शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

यवतमाळची नवी ओळख ‘वाघांचा जिल्हा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:01 IST

कापसाचा जिल्हा, शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा या ओळखींच्या पलिकडे यवतमाळला आता ‘वाघांचा जिल्हा’ असे नवे बिरुद चिकटण्याची शक्यता आहे. टिपेश्वर अभयारण्य आणि अभयारण्याच्या लगतच्या क्षेत्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यभरातील पर्यटकांचे लक्ष यवतमाळने वेधून घेतले आहे.

ठळक मुद्देनिसर्ग पर्यटनाला वाव : पांढरकवडा वनक्षेत्रात वाढले वाघ

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कापसाचा जिल्हा, शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा या ओळखींच्या पलिकडे यवतमाळला आता ‘वाघांचा जिल्हा’ असे नवे बिरुद चिकटण्याची शक्यता आहे. टिपेश्वर अभयारण्य आणि अभयारण्याच्या लगतच्या क्षेत्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यभरातील पर्यटकांचे लक्ष यवतमाळने वेधून घेतले आहे. सोमवारी साजऱ्या होत असलेल्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या व्याघ्रवैभवावर एक नजर.वाघांच्या अधिवासाबाबत, संख्येबाबत जनजागृती वाढविण्यासाठी २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. नेमकी याच जागृतीची यवतमाळ जिल्ह्यात मात्र उणीव आहे. पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघांच्या अधिवासासाठी अनुकूल नैसर्गिक वातावरण असले तरी स्थानिक नागरिकांमध्ये त्याबाबत जागृती नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे हे अभयारण्य अद्यापही व्याघ्र प्रकल्प घोषित होऊ शकले नाही.प्रत्यक्षात अभयारण्य आणि अभयारण्याच्या आजूबाजूच्या परिसरात जवळपास २९ वाघांचा वावर असल्याची माहिती या भागातील वन्यजीव अभ्यासक डॉ. राजू विराणी यांनी दिली. यंदाच्या हंगामात तर मुंबईपासून पुण्यापर्यंतच्या पर्यटकांनी टिपेश्वरला भेट दिली. वाघांची संख्या सतत वाढत असल्यामुळे आता जिल्ह्यात निसर्ग पर्यटन, कम्युनिटी टुरिझमला मोठा वाव निर्माण झाला आहे.स्थानिकांना रोजगाराची संधीटिपेश्वर अभयारण्यात पूर्ण वाढ झालेले चार वाघ, सहा सबअ‍ॅडल्ट वाघ (दीड ते दोन वर्ष वय), आणि सात बछडे असे १७ वाघ आहेत. शिवाय तीन वाघ इतरत्र ‘मायग्रेट’ झाले आहेत. तर अभयारण्याच्या बाहेर पांढरकवडा वनक्षेत्रात जवळपास १२ वाघ वावरत असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक डॉ. राजू विराणी यांनी दिली. मात्र अवैध जंगल तोड, अनिर्बंध चराई, अतिक्रमण याबाबींमुळे जंगलांवर ताण वाढत आहे. या परिस्थितीत स्थानिक लोकांना वन्यजीव संरक्षण व संवर्धन याबाबत प्रशिक्षण दिल्यास निसर्ग पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Tigerवाघ