शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचे तापमान अवघे ६.४ अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 22:01 IST

हिमवादळाच्या तांडवाचा जगभरात कहर सुरू आहे. उत्तरेकडे त्याचा प्रकोप सुरू आहे. कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्या गारठयाची लाट दक्षीण भारतापर्यंत पोहोचली आहे. विदर्भालाही या लाटेचा मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देविदर्भात सर्वात कमी : ऋतुचक्र बदलले, ५० वर्षातला थंडीचा मोठा मुक्काम

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिमवादळाच्या तांडवाचा जगभरात कहर सुरू आहे. उत्तरेकडे त्याचा प्रकोप सुरू आहे. कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्या गारठयाची लाट दक्षीण भारतापर्यंत पोहोचली आहे. विदर्भालाही या लाटेचा मोठा फटका बसला आहे. हवामान अभ्यासकांनी गत ५० वर्षातील थंडीचा सर्वात मोठा मुक्काम असल्याचे मत नोंदविले. ऋतूचक्र बिघडण्याचा धोका वाढला असून याचा फटका शेतीला बसणार आहे.वातावरण बदलामुळे उत्तरेकडील बर्फ वादळ मध्य भारतापर्यंत पोहचले आहे. यामुळे गत महिनाभरापासून थंडीचा जोर जिल्ह्यात कायम आहे. गत ५० वर्षात प्रथमच असे घडले. हा प्रकार निसर्गचक्र प्रभावित झाल्याचेच संकेत आहे. पूर्वी जानेवारी मध्यापर्यंत थंडीचा जोर कायम राहत होता. आता १० फेब्रुवारीपर्यंत थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिमवादळामुळे उष्ण वारे आणि थंड वारे विदर्भात एकमेकाला भिडणार आहेत. यातून वारंवार कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर प्रामुख्याने जाणवणार आहे. यामुळे गारपिटीसारख्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागण्याचा धोका वाढला आहे.पूर्वी मार्च अखेरीस गारपीट आणि पाऊस येत होता. आता हिमवादळामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अशा घटना घडत आहे. जंगल क्षेत्र घटल्याचा हा परिणाम आहे. यातून विविध क्षेत्रामध्ये विपरित परिणाम होण्याची चिन्हे आहेत.शेतीचा लागवड कालावधी लांबणारतापमानातील सततच्या बदलाने भुईमुगाचे क्षेत्र बाद होण्याची चिन्हे आहेत. तर गहू आणि हरभरा लागवडीचा कालावधी लांबला आहे. यावर्षी तर शेतकऱ्यांनी पºहाटी उपटून गव्हाचीच मोठ्या प्रमाणात लागवड केली. निसर्ग प्रकोपावर मात करणारे पीक शेतकऱ्यांना निवडावे लागणार आहे.यावर्षीचे सर्वात कमी तापमानयवतमाळ जिल्ह्यात सोमवारी तापमानाचा पारा १०.४ अंशावर होता. मंगळवारी हे तापमान निम्म्यावर आले. ६.४ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. यावर्षीचे सर्वात कमी तापमान मंगळवारी नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्वात कमी तापमान यवतमाळात नोंदविण्यात आले आहे.निसर्गाच्या असमतोलाने तापमानात बदल होत आहे. यामुळे थंडीचा मुक्काम वाढला. उन्हाचा पाराही यावर्षी वर चढण्याची चिन्हे आहेत. तापमान बदलाचा हा ग्लोबल इफेक्ट स्थानिक पातळीवर झाला आहे. यामुळे गारपीट होण्याचा धोका कायम आहे.- सुरेश चोपने,हवामान अभ्यासक, चंद्रपूर

टॅग्स :Temperatureतापमानweatherहवामान