शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

यवतमाळच्या मातीची ताकद ‘लोकमत’

By admin | Updated: June 8, 2017 01:30 IST

यवतमाळच्या मातीत रुजून अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत करणारे ‘लोकमत’ आता वृत्तपत्र नव्हेतर जनचळवळ झाली आहे.

यवतमाळच्या मातीत रुजून अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत करणारे ‘लोकमत’ आता वृत्तपत्र नव्हेतर जनचळवळ झाली आहे. १९५२ साली यवतमाळातून सुरू झालेल्या साप्ताहिक लोकमतचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. द्विसाप्ताहिक-दैनिक असा प्रवास करत आज घराघरात लोकमत पोहोचला आहे. एकापाठोपाठ एक यशोशिखर सर करणाऱ्या लोकमतच्या अमरावती युनिटचा आज तिसरा वर्धापनदिन... स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नाव. गांधीजींच्या आवाहनावरून स्वातंत्र्य लढ्याच्या होमकुंडात स्वत:ला झोकून दिले. ११ आॅगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. जबलपूरच्या तरुंगात २१ महिन्यांचा खडतर तुरुंगवास भोगला. या तुरुंगवासानंतर बाबूजींचे राष्ट्रप्रेम अधिकच तावून सलाखून निघाले. समाजासाठी झटणाऱ्या बाबूजींना पत्रकारितेची ओढ होती. जुलै १९४९ मध्ये त्यांनी ‘नवे जग’ साप्ताहिक सुरू करून पत्रकारितेत पाऊल ठेवले. लोकनायक बापूजी अणे यांनी १९१८ पासून ‘लोकमत’ या नावाने साप्ताहिक सुरू केले होते. ब्रिटिश सरकारने १९३३ मध्ये बंद पाडले. बाबूजींनी अणे यांची भेट घेऊन बंद पडलेले लोकमत साप्ताहिक सुरू करण्याची परवानगी मागितली. १ मे १९५३ मध्ये यवतमाळातून लोकमत साप्ताहिक पुन्हा प्रकाशित होऊ लागले. एकप्रकारे एका जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. बाबूजींनी लोकमत साप्ताहिकाचे रूपांतर १९६० मध्ये द्वैसाप्ताहिकात केले. पंरतु बाबूजींना ते क्षेत्र अपुरे वाटत होते. लोकमतचे दैनिकात रूपांतर करून विदर्भाचा आवाज बुलंद करण्याचा त्यांनी निश्चिय केला आणि तो स्वप्नपूर्तीचा दिवस १५ डिसेंबर १९७१ उजाडला. दैनिक स्वरूपात लोकमत नागपूर येथून प्रकाशित होऊ लागले. यवतमाळच्या मातीत रुजलेल्या या वृक्षाचा वटवृक्ष झाला. या वृक्षाच्या फांद्या केवळ महाराष्ट्राच्याच नव्हेतर गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशातही पसरल्या. लोकमतच्या जडणघडणीत गावागावातील एजंटांपासून ते पत्रपंडित पां.वा. गाडगिळ आणि बाबा दळवी यांचे मोठे योगदान आहे. वार्ताहर आणि एजंटांचे महाराष्ट्राच्या गावागावात जाळे पसरल्याने पहाटेच लोकमत वाचकांच्या हातात पोहोचतो. एजंट आणि वार्ताहरांचे परिश्रम आणि वाचकांचे प्रेम याच भरवशावर लोकमतने मराठी वृत्तपत्रसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. लोकमतने समाजमनाची नाडी पकडून नवनवीन प्रयोग केले. या काळात लोकमतच्या वैचारिक भूमिकेशी अनेकजन जुळले गेले. लोकमतने नवनवीन प्रयोग केले. मराठी वृत्तपत्रसृष्टीत प्रयोगशिल वृत्तपत्र म्हणून आजही लोकमतची वेगळी ओळख आहे. लोकमतने सर्वप्रथम तालुकास्तरावर आणि गावपातळीवर वार्ताहर नेमून ग्रामीण बातम्यांना हक्काचे स्थान दिले. स्वतंत्र जिल्हा कार्यालयाची संकल्पना लोकमतनेच अंमलात आणली. जिल्ह्याची स्वतंत्र पुरवणी काढणारे लोकमत हे देशातील पहिले वृत्तपत्र ठरले.