शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचे सीताफळ गुजरातला

By admin | Updated: January 9, 2017 02:08 IST

जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील गणोरी या छोट्याशा गावातील सीताफळ महाराष्ट्रातील प्रमुख

पॅकिंगवर बळीराजाची मोहर : मुख्यमंत्र्यांनीही घेतली दखल यवतमाळ : जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील गणोरी या छोट्याशा गावातील सीताफळ महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह आता गुजरातपर्यंत पोहचले आहे. या सीताफळाच्या पॅकींगवर बळीराजा चेतना अभियानाच्या लोगोची मोहर उमटली आहे. विशेष म्हणजे या सीताफळाची दखल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीही घेतली. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या वाणाची पाहनी करण्यासाठी यवतमाळच्या दिशेने आगेकूच केली आहे. बाभूळगाव शहरापासून ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या गणोरी गावात शरदचंद्र उत्तरवार यांनी सीताफळाची लागवड केली. पूर्वी ही जमीन पडीत होती. कुठलेही पीक या ठिकाणी घेतले जात नव्हते. विशेष म्हणजे या भागात पाणी नाही. दोन विहिरी आणि दोन बोअरवेल केल्या नंतरही पुरेसे पाणी पिकांना मिळणे अवघड बाब आहे. कमी पाण्यात बागायती पीक घेण्यासाठी त्यांनी अभ्यास केला. आणि सीताफळाची निवड केली. मात्र यासाठी शेतकऱ्यानेच विकसीत केलेले वान त्यांनी शेतात लावले. सीताफळाचे हे वान पंढरपुरमधील बार्शी येथून त्यांनी आणले आहे. तीन एकरात एक हजार झाडांची लागवड केली. हे सीताफळ कमी बिया आणि अधिक मगस असणारे आहे. साधारणत: पाचशे किलोग्रॅम वजनाचे एक सीताफळ आहे. पारंपरीक सिताफळातील ही विकसीत जात आहे. यामुळे या सिताफळाला राज्यभरातून मोठी मागणी होत आहे. नागपूर, पुण, नाशिक आणि गुजरात मधील सुरतपर्यंत हे सिताफळाचे वान पोहचले आहे. या सिताफळाला ग्राहकाची चांगली पसंती लाभली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी सध्या त्यांची परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यवतमाळ दौऱ्यावर आले असताना त्यांनी या सिताफळाची पाहणी केली, यावेळी त्यांनी उत्तरवारांचे कौतुक केले. विशेष म्हणजे कमी पाण्यात येणारे वान असल्याने कृषी विभागाला या संदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. उत्तरवार यांनी सिताफळाचे पॅकिंग तयार केले आहे. त्याला बळीराजा चेतना अभियानाचा लोगो लावला आहे. या आकाराने मोठे आणि मगसदार सिताफळाने बाजारात एक वेगळ स्थान मिळविले आहे. या पिकाला वन्यप्राणी किंवा पक्षी खात नाही तसेच कुठल्याही पाणी टंचाईचा फटका बसत नाही. यामुळे हे फळपिक अकृषक क्षेत्रातही किफायदशीर ठरणारे आहे. उत्तरवार यांना या एक हजार झाडांपासून जवळपास चार लाखांचे उत्पादन झाले आहे. यासोबतच त्यांनी पाच एकरात मोसंबिची बाग लावली आहे. इतर क्षेत्रात ते पारंपरीक पीक घेत आहेत. काळानुसार होणारे बदल आणि नावीन्यपूर्ण शेतीच्या प्रयोगातून समृद्धी शक्य असल्याचे मत त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले आहे. (शहर वार्ताहर)