शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

यवतमाळातील ऐतिहासिक वास्तू कुलूपबंद

By admin | Updated: May 27, 2014 01:09 IST

आचार्य विनोबा भावे यांनी राबविलेल्या भूदान चळवळीला सर्वाधिक प्रतिसाद यवतमाळ जिल्ह्यात मिळाला. शेतकर्‍यांनी दान दिलेली शेतजमीन भूमिहीन कुटुंबाला वाटप करण्यात आली.

भूदान चळवळ : पंडित नेहरुंची भेट, स्मृतिदिनी तरी खुले होईल काय उद्यान

रूपेश उत्तरवार - यवतमाळ

आचार्य विनोबा भावे यांनी राबविलेल्या भूदान चळवळीला सर्वाधिक प्रतिसाद यवतमाळ जिल्ह्यात मिळाला. शेतकर्‍यांनी दान दिलेली शेतजमीन भूमिहीन कुटुंबाला वाटप करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाचे क्षणाचा शुभारंभ यवतमाळातून झाला. यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना निमंत्रित करण्यात आले होते. अशा या स्थळाची साक्ष देणारी वास्तू यवतमाळात उभी आहे. मात्र ती कडेकोट कुलूपात बंदिस्त आहे. त्यामुळे नवी पिढी या ऐतिहासिक घटनेच्या माहितीपासून कोसो दूर आहे. मध्य प्रदेशात जमिनदार आणि भूमिहीनांमध्ये चांगलेच वादंग निर्माण झाले होते. हा पेच सोडविण्यासाठी आचार्य विनोबा भावेंना बोलविण्यात आले होते. त्यावेळी विनोबा भावेंनी दोन्ही बाजू एकून घेतल्या आणि जमिनदारांना आपल्याकडील जमीन दान मागितली. यावेळी आचार्य विनोबा भावे यांनी केलेले वैचारिक परिवर्तन जमिनदारांनाही मनातून भावले. त्यावेळी जमिनदारांनी आपल्याकडील काही जमीन विनोबा भावेंना दान दिली. त्यांनी ही जमीन भूमिहीन कुटुंबात वाटप केली. विनोबा भावे यांचे हे काम सर्वांना प्रेरणादायी ठरले. यानंतर हा प्रश्न इतरही ठिकाणी भेडसावल्याने त्यावेळी विनोबा भावे यांनी पवनार येथून पदयात्रा काढली. प्रत्येक गावी त्यांनी वैचारिक परिवर्तनाचं कामं केलं आणि जमिनदारांना जमीन दान मागितली. ही भूदान चळवळ गावखेड्यात पोहोचली. याच चळवळीला यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. याठिकाणी एक लाख ३७ एकर शेतजमीन विनोबांना दान करण्यात आली. मिळालेले भूदान भूमिहीनांना देण्यासाठी कार्यक्रमही तयार करण्यात आला. त्यासाठी पंडित नेहरू यांना १८ एप्रिल १९५९ रोजी यवतमाळात निमंत्रित करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. यावेळी झालेली सभा प्रचंड गाजली. या सभेनंतर भूदानातील जमिनीचे वाटप भूमिहीनांना करण्यात आले. त्यामुळे हा दिवस जिल्ह्यातील नागरिकांसाठी ऐतिहासिक आहे. यवतमाळच्या गोदणी मार्गावर सध्याच्या आकाशवाणी केंद्रालगत ही सभा झाली होती. यवतमाळ नगरपरिषदेने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू स्मृतिमंच आणि उद्यान नावाने जागेचे सौंदर्यीकरण केले. याठिकाणी पंडित नेहरूंची झालेली सभा भिंतीवर छायांकित करण्यात आली. यासोबतच या सभेला उपस्थित मान्यवरांचे चित्रही आहे. ही ऐतिहासिक वास्तू उद्यानाच्या माध्यमातून अधिक खुलविण्यात आली आहे. मात्र हे सर्व सौंदर्य कुलूपबंद करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी आहे तरी, काय याची माहिती कुणालाही कळत नाही. सदर उद्यान सदैव खुले राहिल्यास तरुण पिढीला ऐतिहासिक वास्तूची कल्पना येईल. मात्र लागलेल्या कुलपाने इतिहास बंदिस्त झाला आहे. पंडित नेहरू यांचा मंगळवारी स्मृतिदिन आहे. या दिवसी तरी, नगरपरिषदेने ही वास्तू आणि उद्यान खुला करण्यासाठी पावले उचलले तर पंडित नेहरूंना खरी श्रध्दांजली ठरेल.