शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या ‘अर्धांतर’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:31 IST

यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली.

ठळक मुद्देशेतकरी आत्महत्याउपायांची कारण मिमांसा

हमीदखाँ पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली. जवके यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यवतमाळ येथील तरूण नीरज जवके यांनी अवघ्या १६ मिनीटांचा ‘अर्धांतर’ हा लघुपट निर्माण केला आहे. या लघुपटातून शेतकरी आत्महत्यांना पूर्ण विराम मिळावा म्हणून संघटन हाच उपाय असल्याचा संदेश देण्यात आला. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. ‘दि मेकर्स इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅण्ड व्हिडीओ’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या लघुपटाने बाजी मारली. कोलकाता येथे झालेल्या या स्पर्धेत दिग्दर्शक नीरज माणिकराव जवके यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार या लघुपटाने मिळवून दिला.बळीराजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा संदेश देण्यासाठी पुण्याई प्रॉडक्शन व द ग्रुप आॅफ फ्युचरतर्फे या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. अवघ्या १६ मिनीटाच्या या लघुपटात केवळ शेतकऱ्यांच्या समस्याच न दाखविता त्यावरील उपाय योजनाही दर्शविण्यात आले आहे. हेच या लघुपटाचे वैशिष्ट्य ठरले आहे.या लघुपटाचे लेखन व सहदिग्दर्शन धनश्री टेकाडे, संगीत कोमल झोपाटे, मार्केटिंग नयन टेकाडे, प्रकाश व्यवस्था मिलींद ठाकरे व वेशभूषेची जबाबदारी प्रतीक्षा पडोळे यांनी सांभाळली. कोलकाता येथील स्पर्धेत विविध देशांतून अनेक लघुपट सादर झाले. या स्पर्धेत भारतातर्फे ‘अर्धांतर’ या एकमेव लघुपटाला नामांकन मिळाले होते. या लघुपटात विजय जोशी, प्रसन्ना गुजलवार, चेतन चौधरी, प्रसाद मिसाळ, विनोद मुधाने या प्रमुख कलाकारांसह मयूर आथिलकर, पंकज रोकडे, निखिल गावंडे यांनी सहकलाकारांच्या भूमिका साकारल्या आहे. हा लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विपीन चौधरी, शैलेष डाखोरे, अनिल चौधरी, अवंती चौधरी, सायली चौधरी, प्रशांत गावंडे, अनिल टेकाडे आदींचे सहकार्य लाभले.शेतकऱ्यांचे संघटन आवश्यकया लघुपटातून शेतकऱ्यांच्या संघटनावर भर देण्यात आला. जोपर्यंत शेतकरी संघटीत होणार नाही, तोपर्यंत त्यांच्या समस्या सुटणार नाही, असा संदेश लघुपटातून देण्यात आला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याची प्रतीक्षा न करता शेतकऱ्यांनीही त्यांच्या समस्यासाठी एकत्र येऊन मार्ग शोधणे गरजेचे असल्याचा संदेश देण्यासाठी ‘अर्धांतर’ची निर्मिती झाल्याचे दिग्दर्शक नीरज जवके यांनी सांगितले.

टॅग्स :artकला