शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

यवतमाळच्या ‘अर्धांतर’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:31 IST

यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली.

ठळक मुद्देशेतकरी आत्महत्याउपायांची कारण मिमांसा

हमीदखाँ पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली. जवके यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यवतमाळ येथील तरूण नीरज जवके यांनी अवघ्या १६ मिनीटांचा ‘अर्धांतर’ हा लघुपट निर्माण केला आहे. या लघुपटातून शेतकरी आत्महत्यांना पूर्ण विराम मिळावा म्हणून संघटन हाच उपाय असल्याचा संदेश देण्यात आला. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. ‘दि मेकर्स इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅण्ड व्हिडीओ’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या लघुपटाने बाजी मारली. कोलकाता येथे झालेल्या या स्पर्धेत दिग्दर्शक नीरज माणिकराव जवके यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार या लघुपटाने मिळवून दिला.बळीराजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा संदेश देण्यासाठी पुण्याई प्रॉडक्शन व द ग्रुप आॅफ फ्युचरतर्फे या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. अवघ्या १६ मिनीटाच्या या लघुपटात केवळ शेतकऱ्यांच्या समस्याच न दाखविता त्यावरील उपाय योजनाही दर्शविण्यात आले आहे. हेच या लघुपटाचे वैशिष्ट्य ठरले आहे.या लघुपटाचे लेखन व सहदिग्दर्शन धनश्री टेकाडे, संगीत कोमल झोपाटे, मार्केटिंग नयन टेकाडे, प्रकाश व्यवस्था मिलींद ठाकरे व वेशभूषेची जबाबदारी प्रतीक्षा पडोळे यांनी सांभाळली. कोलकाता येथील स्पर्धेत विविध देशांतून अनेक लघुपट सादर झाले. या स्पर्धेत भारतातर्फे ‘अर्धांतर’ या एकमेव लघुपटाला नामांकन मिळाले होते. या लघुपटात विजय जोशी, प्रसन्ना गुजलवार, चेतन चौधरी, प्रसाद मिसाळ, विनोद मुधाने या प्रमुख कलाकारांसह मयूर आथिलकर, पंकज रोकडे, निखिल गावंडे यांनी सहकलाकारांच्या भूमिका साकारल्या आहे. हा लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विपीन चौधरी, शैलेष डाखोरे, अनिल चौधरी, अवंती चौधरी, सायली चौधरी, प्रशांत गावंडे, अनिल टेकाडे आदींचे सहकार्य लाभले.शेतकऱ्यांचे संघटन आवश्यकया लघुपटातून शेतकऱ्यांच्या संघटनावर भर देण्यात आला. जोपर्यंत शेतकरी संघटीत होणार नाही, तोपर्यंत त्यांच्या समस्या सुटणार नाही, असा संदेश लघुपटातून देण्यात आला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याची प्रतीक्षा न करता शेतकऱ्यांनीही त्यांच्या समस्यासाठी एकत्र येऊन मार्ग शोधणे गरजेचे असल्याचा संदेश देण्यासाठी ‘अर्धांतर’ची निर्मिती झाल्याचे दिग्दर्शक नीरज जवके यांनी सांगितले.

टॅग्स :artकला