शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

यवतमाळच्या ‘अर्धांतर’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:31 IST

यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली.

ठळक मुद्देशेतकरी आत्महत्याउपायांची कारण मिमांसा

हमीदखाँ पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली. जवके यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यवतमाळ येथील तरूण नीरज जवके यांनी अवघ्या १६ मिनीटांचा ‘अर्धांतर’ हा लघुपट निर्माण केला आहे. या लघुपटातून शेतकरी आत्महत्यांना पूर्ण विराम मिळावा म्हणून संघटन हाच उपाय असल्याचा संदेश देण्यात आला. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. ‘दि मेकर्स इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅण्ड व्हिडीओ’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या लघुपटाने बाजी मारली. कोलकाता येथे झालेल्या या स्पर्धेत दिग्दर्शक नीरज माणिकराव जवके यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार या लघुपटाने मिळवून दिला.बळीराजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा संदेश देण्यासाठी पुण्याई प्रॉडक्शन व द ग्रुप आॅफ फ्युचरतर्फे या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. अवघ्या १६ मिनीटाच्या या लघुपटात केवळ शेतकऱ्यांच्या समस्याच न दाखविता त्यावरील उपाय योजनाही दर्शविण्यात आले आहे. हेच या लघुपटाचे वैशिष्ट्य ठरले आहे.या लघुपटाचे लेखन व सहदिग्दर्शन धनश्री टेकाडे, संगीत कोमल झोपाटे, मार्केटिंग नयन टेकाडे, प्रकाश व्यवस्था मिलींद ठाकरे व वेशभूषेची जबाबदारी प्रतीक्षा पडोळे यांनी सांभाळली. कोलकाता येथील स्पर्धेत विविध देशांतून अनेक लघुपट सादर झाले. या स्पर्धेत भारतातर्फे ‘अर्धांतर’ या एकमेव लघुपटाला नामांकन मिळाले होते. या लघुपटात विजय जोशी, प्रसन्ना गुजलवार, चेतन चौधरी, प्रसाद मिसाळ, विनोद मुधाने या प्रमुख कलाकारांसह मयूर आथिलकर, पंकज रोकडे, निखिल गावंडे यांनी सहकलाकारांच्या भूमिका साकारल्या आहे. हा लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विपीन चौधरी, शैलेष डाखोरे, अनिल चौधरी, अवंती चौधरी, सायली चौधरी, प्रशांत गावंडे, अनिल टेकाडे आदींचे सहकार्य लाभले.शेतकऱ्यांचे संघटन आवश्यकया लघुपटातून शेतकऱ्यांच्या संघटनावर भर देण्यात आला. जोपर्यंत शेतकरी संघटीत होणार नाही, तोपर्यंत त्यांच्या समस्या सुटणार नाही, असा संदेश लघुपटातून देण्यात आला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याची प्रतीक्षा न करता शेतकऱ्यांनीही त्यांच्या समस्यासाठी एकत्र येऊन मार्ग शोधणे गरजेचे असल्याचा संदेश देण्यासाठी ‘अर्धांतर’ची निर्मिती झाल्याचे दिग्दर्शक नीरज जवके यांनी सांगितले.

टॅग्स :artकला