शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

यवतमाळमधील कृषी सचिवांनी घेतली आढावा बैठक, अनधिकृत किटकनाशके विकणा-यांवर कारवाई करण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 17:45 IST

किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.2) आढावा बैठक घेतली.

यवतमाळ, दि. 2 : किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.2) आढावा बैठक घेतली. यावेळी कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना प्रधान सचिव बिजयकुमार म्हणाले, किटकनाशक फवारणीमुळे काही शेतक-यांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर रुग्णालयात भरती आहेत. हा अतिशय गंभीर विषय आहे. त्यामुळे कृषी विभागाने गांभिर्याने काम करावे. तसेच ग्रामस्तरावरील यंत्रणेला अधिक सक्षम करून शेतक-यांना फवारणीबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करावे. यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. कृषी अधिका-यांनी किटकनाशक वापरण्याबाबत मार्गदर्शक सुचना शेतक-यांना फिल्डवर जाऊन समजवून सांगाव्या. केवळ नफा कमाविण्याच्या उद्देशाने कृषी केंद्रांकडून अनधिकृत किटकनाशके विकली जात असेल तर त्याची चौकशी करा. अशा केंद्रांबद्दल कोणतीही सहानुभुती न दाखविता त्यांच्यावर त्वरीत कारवाई करा. कृषी केंद्र चालकांनीसुध्दा सामाजिक दायित्व जोपासून फवारणीबाबत शेतक-यांना योग्य सल्ला द्यावा. केवळ कंपन्यांच्या नफ्यासाठी काम करू नये. तसेच फवारणीदरम्यान विषबाधा होऊ नये म्हणून केंद्र चालकांनी शेतक-यांना हातमोजे, चष्मा असलेली किट स्वस्त दरात किंवा शक्य झाल्यास मोफत उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले. यावेळी कृषी सचिवांनी जिल्ह्यात किती लोकांना विषबाधा झाली, मृतकांची संख्या किती, उपचार करून घरी पाठविलेल्या रुग्णांची संख्या, कृषी विभागाकडून करण्यात येणा-या उपाययोजना, रुग्णालयातील परिस्थती आदींबाबत माहिती घेतली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी.जी. धोटे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.सुरेश नेमाडे, मारेगावचे तहसीलदार विजय साळवे, जिल्हा कामगार अधिकारी राजदीप धुर्वे, केळापुरचे नायब तहसीलदार टी.डी.बोनगीरवार यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत झालेले कळंब येथील देविदास मडावी यांच्या घरी प्रधान सचिव बिजयकुमार यांनी भेट देऊन कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. अशोक उईके, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेती